शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

धोकादायक इमारती खाली करण्याचे आदेश

By admin | Updated: August 6, 2015 00:41 IST

शहरातील ९२ अनधिकृत बांधकामे तत्काळ खाली करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. बाजार समितीनेही कांदा - बटाटा मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांना

नवी मुंबई : शहरातील ९२ अनधिकृत बांधकामे तत्काळ खाली करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. बाजार समितीनेही कांदा - बटाटा मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांना गाळे १५ दिवसांमध्ये खाली करण्याची नोटीस दिली आहे. प्रशासनाने नोटीस दिली असली तरी पर्याय नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन धोकादायक वास्तूंमध्ये राहण्याशिवाय नागरिकांसमोर दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. ठाणेमधील कृृष्णा निवास ही तीन मजली इमारत कोसळून १२ ठार व ७ जण जखमी झाल्याची घटना घडल्यानंतर नवी मुंबईमधील अनधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महापालिकेने शहरातील जवळपास ९२ बांधकामे धोकादायक घोषित केली आहेत. या सर्व इमारती तत्काळ खाली करण्याचे आदेश जुलैमध्ये पालिका प्रशासनाने संबंधितांना दिले आहेत. वाशीतील जेएन टाईप व नेरूळमधील अनेक इमारती अनेक वर्षांपासून धोकादायकच्या यादीमध्ये आहेत. सदर इमारती कोणत्याही वेळी कोसळून मोठ्याप्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांसाठी जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. रोजच्या सूर्योदयाबरोबर पुनर्जन्म झाल्यासारखे अनेकांना वाटत आहे. पालिकेने घरे खाली करायला सांगितले असले तरी जायचे कुठे, असा प्रश्न पडत आहे. विकत घेतलेल्या घरांचे कर्जच अजून संपले नाही, मग दुसरीकडे घर कसे घ्यायचे. घर भाड्याने घेतले तरी घर चालवायचे कसे, असा प्रश्न रहिवाशांसमोर आहे. बाजार समितीमधील कांदा - बटाटा मार्केट धोकादायक घोषित करण्यात आले आहे. पालिकेने एपीएमसी प्रशासनास नोटीस दिल्यानंतर बाजार समितीने सर्व व्यापाऱ्यांना मार्केट १५ दिवसांमध्ये खाली करण्याची नोटीस दिली आहे. मार्केटमधील गाळे खाली करा. जर अपघात झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाने मार्केट खाली करायला सांगितले असले तरी व्यापारासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिलेली नाही. यामुळे व्यापारी आहेत त्याच स्थितीमध्ये व्यापार करत आहेत. ठाणेमधील दुर्घटनेमध्ये १२ जणांचा बळी गेला आहे, परंतु नवी मुंबईमध्ये वाशी, नेरूळ किंवा एपीएमसीमध्ये दुर्घटना घडली तर मोठ्याप्रमाणात जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.