शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बाजार समिती कायद्यातील सुधारणा विधेयकाला विरोध; व्यापारी संघटनांचा आंदोलनाचा इशारा 

By नामदेव मोरे | Updated: February 14, 2024 18:05 IST

विधेयकाला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केटच्या व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे.

नवी मुंबई: राज्य शासनाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियम) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा करणारे विधेयक क्रमांक ६४ तयार केले आहे. या विधेयकाला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केटच्या व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे. बाजार समितीचे अस्तीत्व संपविण्याचा सरकारचा डाव असून या विरोधात कायदेविषयी सल्ला घेवून तीव्र लढा उभाण्याचा निर्धार केला आहे. द ग्रेन, राईस ॲण्ड ऑईल सीड्स मर्चंट असोसिएशन (ग्रोमा) संघटनेच्या कार्यालयामध्ये मंगळवारी बाजार समितीमधील पाचही मार्केटमधील व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये शासनाच्या सुधारीत विधेयकामुळे बाजार समितीवर होणाऱ्या परिणामांवर चर्चा करण्यात आली. 

लोकशाही पद्धतीने बाजार समितीवर नियुक्त होणाऱ्या संचालकांच्याऐवजी नामनिर्देशीत सदस्यांच्या तरतुला सर्वांनी कडाडून विरोध केला. यामुळे बाजार समितीशी संबंध नसलेले घटक सदस्य म्हणून येण्याची भिती व्यक्त करण्यात आली. शासनाने यापूर्वी ईनाम पद्धती सुरू केली. पण याला प्रतिसाद मिळालेला नाही. पुन्हा ईनाम लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोल्ड स्टोरेज व गोडावूनमध्ये कृषी व्यापार करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. राष्ट्रीय बाजारच्या नावाखाली बाजार समित्या संपविण्याचा डाव असून याला सर्वच व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे.

शासनाच्या सुधारणा विधेयकाला कायदेशीर सल्ला घेवून विरोध करण्यात येणार आहे. वेळ पडल्यास राज्यव्यापी आंदोलन केले जाणार असून वेळ पडल्यास हजारो व्यापारी उपोषणाला बसतील इसा इशाराही दिला आहे. या बैठकीला ग्रोमाचे प्रमुख शरद मारू, मोहन गुरनानी, महेंद्र गजरा, अमृतलाल जैन, भीमजी भानुशाली, निलेश वीरा, संजय पानसरे, अशोक वाळुंज, कीर्तीराणा, अमरीश बरोत, यांच्यासह इतर व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना सर्व नियम व बाहेर सर्वांना सुट अशी दुहेरी निती नको. सरकारने सर्वांना समान नियम लावणे आवश्यक असल्याची मागणीही करण्यात आली. वाराई संदर्भात पणन विभागाने काढलेल्या परिपत्रकावरही चर्चा करण्यात आली.

बैठकीमध्ये व्यापारी प्रतिनिधींनी व्यक्त केलेली भूमिका

  • हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. एक समिती स्थापन करून व्यापाऱ्यांची एकजूट दाखविण्याची गरज आहे. - शरद मारू, अध्यक्ष ग्रोमा
  • व्यापाऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. समिती स्थापन करून विधेयकाविरोधात लढा देण्यात येईल. - संजय पानसरे, संचालक फळ मार्केट
  • या विषयी कायदेविषयक सल्ला घेवून पुढील कार्यवाही करावी. सर्वांनी एकजूट ठेवून शासनाला निवेदन द्यावे. वेळ पडल्यास बेमुदत उपोषण सुरू करावे. - मोहन गुरनाने, अध्यख फाम 
  • सर्व मार्केटमधील व्यापारी प्रतिनिधींची व्यापारी संरक्षण समिती स्थापन करावी व या कायद्याविरोधात सनदशीर मार्गाने लढा द्यावा. भीमजी भानुषाली - सचीव ग्रोमा
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई