शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

कर्जमाफीसाठी विरोधकांची स्टंटबाजी

By admin | Updated: April 20, 2017 03:25 IST

कर्जमाफीचे आंदोलन म्हणजे विरोधकांचा स्वत:चा पक्ष बळकटीसाठी अवलंबलेला चुकीचा मार्ग असल्याचा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मारला आहे

नवी मुंबई : कर्जमाफीचे आंदोलन म्हणजे विरोधकांचा स्वत:चा पक्ष बळकटीसाठी अवलंबलेला चुकीचा मार्ग असल्याचा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मारला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून राज्यात अनावश्यक मागणी पुढे आणली जात आहे. त्यामुळे आंदोलनाचा तिसरा टप्पा असल्यास तो रद्द करावा असा सल्लाही त्यांनी एपीएमसी येथे कार्यक्रमात दिला.कर्जमाफीसाठी सरकार बांधील असून त्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे. त्यापूर्वी शेतकरी सशक्त करण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. अनेक शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची सवय लागली आहे. त्यापैकी जे कर्जाची परतफेड करू शकत नाहीत अशांना खऱ्या अर्थाने कर्जमाफी मिळण्याची गरज असल्याचे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. मात्र विरोधकांनी गरज नसतानाही सरसकट कर्जमाफीची मागणी करून तसे वातावरण तयार केले आहे. शिवाय उत्तर प्रदेशमधील निर्णयाची तुलना महाराष्ट्रासोबत केली जात आहे. यामुळे विरोधकांचे सुरू असलेले आंदोलन म्हणजे स्वत:चा पक्ष बळकट करण्यासाठी अवलंबलेला चुकीचा मार्ग असल्याचेही ते म्हणाले. राज्यातला शेतकरी संकटात असून प्रत्येक गावा- गावांमध्ये पाणी पोचवण्याची गरज आहे. त्याकरिता शहरात राहणाऱ्या प्रत्येकाने स्वत:चे गाव समृध्द करण्यावर भर दिला पाहिजे, त्यासाठी सरकार पाठीशी असल्याचीही ग्वाही त्यांनी दिली. यामुळे सुरू असलेल्या आंदोलनाचा तिसरा टप्पा असल्यास तो थांबवण्याचा सल्ला त्यांनी दिला. बुधवारी एपीएमसी येथे माथाडी भवनमधील कै. शिवाजीराव पाटील सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रामुख्याने उपस्थित होते.आत्महत्या थांबवण्यासाठी ज्या जिल्ह्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे, त्याठिकाणी शेतकऱ्यांसाठी समुपदेशक नेमले आहेत. त्याशिवाय सरपंचांकडे ठरावीक रक्कम देवून एखादा शेतकरी आर्थिक संकटात असल्यास त्याला मदतीची तरतूद केलेली असल्याचेही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, भाजपा उपाध्यक्ष प्रसाद लाड, गुलाबराव जगताप आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)