शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी विरोधकांची स्टंटबाजी

By admin | Updated: April 20, 2017 03:25 IST

कर्जमाफीचे आंदोलन म्हणजे विरोधकांचा स्वत:चा पक्ष बळकटीसाठी अवलंबलेला चुकीचा मार्ग असल्याचा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मारला आहे

नवी मुंबई : कर्जमाफीचे आंदोलन म्हणजे विरोधकांचा स्वत:चा पक्ष बळकटीसाठी अवलंबलेला चुकीचा मार्ग असल्याचा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मारला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून राज्यात अनावश्यक मागणी पुढे आणली जात आहे. त्यामुळे आंदोलनाचा तिसरा टप्पा असल्यास तो रद्द करावा असा सल्लाही त्यांनी एपीएमसी येथे कार्यक्रमात दिला.कर्जमाफीसाठी सरकार बांधील असून त्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे. त्यापूर्वी शेतकरी सशक्त करण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. अनेक शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची सवय लागली आहे. त्यापैकी जे कर्जाची परतफेड करू शकत नाहीत अशांना खऱ्या अर्थाने कर्जमाफी मिळण्याची गरज असल्याचे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. मात्र विरोधकांनी गरज नसतानाही सरसकट कर्जमाफीची मागणी करून तसे वातावरण तयार केले आहे. शिवाय उत्तर प्रदेशमधील निर्णयाची तुलना महाराष्ट्रासोबत केली जात आहे. यामुळे विरोधकांचे सुरू असलेले आंदोलन म्हणजे स्वत:चा पक्ष बळकट करण्यासाठी अवलंबलेला चुकीचा मार्ग असल्याचेही ते म्हणाले. राज्यातला शेतकरी संकटात असून प्रत्येक गावा- गावांमध्ये पाणी पोचवण्याची गरज आहे. त्याकरिता शहरात राहणाऱ्या प्रत्येकाने स्वत:चे गाव समृध्द करण्यावर भर दिला पाहिजे, त्यासाठी सरकार पाठीशी असल्याचीही ग्वाही त्यांनी दिली. यामुळे सुरू असलेल्या आंदोलनाचा तिसरा टप्पा असल्यास तो थांबवण्याचा सल्ला त्यांनी दिला. बुधवारी एपीएमसी येथे माथाडी भवनमधील कै. शिवाजीराव पाटील सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रामुख्याने उपस्थित होते.आत्महत्या थांबवण्यासाठी ज्या जिल्ह्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे, त्याठिकाणी शेतकऱ्यांसाठी समुपदेशक नेमले आहेत. त्याशिवाय सरपंचांकडे ठरावीक रक्कम देवून एखादा शेतकरी आर्थिक संकटात असल्यास त्याला मदतीची तरतूद केलेली असल्याचेही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, भाजपा उपाध्यक्ष प्रसाद लाड, गुलाबराव जगताप आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)