शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

कर्जमाफीसाठी विरोधकांची स्टंटबाजी

By admin | Updated: April 20, 2017 03:25 IST

कर्जमाफीचे आंदोलन म्हणजे विरोधकांचा स्वत:चा पक्ष बळकटीसाठी अवलंबलेला चुकीचा मार्ग असल्याचा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मारला आहे

नवी मुंबई : कर्जमाफीचे आंदोलन म्हणजे विरोधकांचा स्वत:चा पक्ष बळकटीसाठी अवलंबलेला चुकीचा मार्ग असल्याचा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मारला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून राज्यात अनावश्यक मागणी पुढे आणली जात आहे. त्यामुळे आंदोलनाचा तिसरा टप्पा असल्यास तो रद्द करावा असा सल्लाही त्यांनी एपीएमसी येथे कार्यक्रमात दिला.कर्जमाफीसाठी सरकार बांधील असून त्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे. त्यापूर्वी शेतकरी सशक्त करण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. अनेक शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची सवय लागली आहे. त्यापैकी जे कर्जाची परतफेड करू शकत नाहीत अशांना खऱ्या अर्थाने कर्जमाफी मिळण्याची गरज असल्याचे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. मात्र विरोधकांनी गरज नसतानाही सरसकट कर्जमाफीची मागणी करून तसे वातावरण तयार केले आहे. शिवाय उत्तर प्रदेशमधील निर्णयाची तुलना महाराष्ट्रासोबत केली जात आहे. यामुळे विरोधकांचे सुरू असलेले आंदोलन म्हणजे स्वत:चा पक्ष बळकट करण्यासाठी अवलंबलेला चुकीचा मार्ग असल्याचेही ते म्हणाले. राज्यातला शेतकरी संकटात असून प्रत्येक गावा- गावांमध्ये पाणी पोचवण्याची गरज आहे. त्याकरिता शहरात राहणाऱ्या प्रत्येकाने स्वत:चे गाव समृध्द करण्यावर भर दिला पाहिजे, त्यासाठी सरकार पाठीशी असल्याचीही ग्वाही त्यांनी दिली. यामुळे सुरू असलेल्या आंदोलनाचा तिसरा टप्पा असल्यास तो थांबवण्याचा सल्ला त्यांनी दिला. बुधवारी एपीएमसी येथे माथाडी भवनमधील कै. शिवाजीराव पाटील सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रामुख्याने उपस्थित होते.आत्महत्या थांबवण्यासाठी ज्या जिल्ह्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे, त्याठिकाणी शेतकऱ्यांसाठी समुपदेशक नेमले आहेत. त्याशिवाय सरपंचांकडे ठरावीक रक्कम देवून एखादा शेतकरी आर्थिक संकटात असल्यास त्याला मदतीची तरतूद केलेली असल्याचेही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, भाजपा उपाध्यक्ष प्रसाद लाड, गुलाबराव जगताप आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)