शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

जेएसडब्ल्यूच्या जलवाहिनीला विरोध

By admin | Updated: April 8, 2016 01:44 IST

येथील केटी बंधारा ते जेएसडब्ल्यू कंपनी, डोलवी अशी नव्याने जलवाहिनी टाकली जात असून नागोठणे ते शेतपळस दरम्यान या भागातील शेतकऱ्यांनी काही हरकती घेतल्यामुळे काम बंद ठेवण्यात आले

नागोठणे : येथील केटी बंधारा ते जेएसडब्ल्यू कंपनी, डोलवी अशी नव्याने जलवाहिनी टाकली जात असून नागोठणे ते शेतपळस दरम्यान या भागातील शेतकऱ्यांनी काही हरकती घेतल्यामुळे काम बंद ठेवण्यात आले आहे. जलवाहिनीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे असल्याने याबाबत रोहे प्रांताधिकारी सुभाष भागडे यांनी जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी तसेच बाधित शेतकऱ्यांची गुरु वारी रोहे येथे बैठक घेतली. ही जलवाहिनी मुंबई - गोवा महामार्गालगत टाकली जात असून महामार्गाच्या रुंदीकरणासाठी आम्ही जागा दिली आहे. येथे जेएसडब्ल्यूची खासगी जलवाहिनी टाकली जात असल्याने याबाबत बाधित शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच एकजूट दाखवीत या बैठकीत त्याला हरकती घेतल्यामुळे संबंधित प्रश्न अद्यापि मार्गी लागलेला नाही. जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनीचे काम पूर्ण होण्यासंदर्भात नागोठणे व शेतपळस येथील बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीचे रोहे येथील उपविभागीय कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बाधित शेतकरी संतोष गुरव यांच्या नेतृत्वाखाली समीर नागोठकर, धर्मा भोपी, असिफ अधिकारी, रु चिर मोरे, कृष्णा धामणे, इन्तिखाब अधिकारी, अनिल ठोंबरे, मधुकर काळे, राजन उपाध्ये, मिलिंद ताले, दिनेश झोलगे, अनिल काळे, मंगेश कामथे, श्रीकांत रावकर, हेमंत वाळंज आदींसह इतर शेतकऱ्यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हरकती संदर्भातले निवेदन सादर केले आहे. त्यात शासनाच्या मागणीनुसार आमची घरे तसेच जमीन महामार्गासाठी दिली असून अन्य कोणत्याही खासगी कंपनीला दिलेली नाही. या पाइपलाइनमुळे संपादित केलेल्या जागेव्यतिरिक्त अन्य जागेची सुद्धा नासधूस होत असली तरी कंपनी कोणत्याही प्रकारची भरपाई देत नाही. ज्या लोकांची राष्ट्रीय महामार्गासाठी जागा संपादित झालेली नाही अशा लोकांची जमीन या जलवाहिनीसाठी संपादित केली जात आहे, ही अन्यायकारक बाब आहे.जलवाहिनी टाकताना कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतली नसल्यामुळे आमच्या जागेत नियमबाह्य पद्धतीने जलवाहिनी टाकू नये. महामार्गासाठी घेतलेली उर्वरित जागा स्थानिक जनतेसाठी रहदारीचा रस्ता असल्याने याच जागेतून ही जलवाहिनी जात असल्याने आमची त्याला हरकत आहे असे नोंदविले आहे.यावेळी संबंधित ५० ते ६० बाधित शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)