शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

वर्गीकरण केले तरच कचरा उचलणार !, ओला-सुका कचरा वेगळा करण्यासाठी कडक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 02:20 IST

नवी मुंबई : दोन वर्षे सातत्याने जनजागृती करूनही ओला सुका कच-याचे वर्गीकरण न करणा-यांविषयी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.

नवी मुंबई : दोन वर्षे सातत्याने जनजागृती करूनही ओला सुका कच-याचे वर्गीकरण न करणा-यांविषयी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. सोमवारपासून कचरा न उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साठलेल्या कच-यामुळे दुर्गंधी किंवा रोगराई निर्माण झाल्यास त्याला पूर्णपणे रहिवासी जबाबदार ठरणार आहेत.देशातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची स्थिती गंभीर झाली आहे. वेळेवर कचरा उचलला जात नाही. उचललेल्या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी डंपिंग ग्राउंडची उणीव जाणवू लागली आहे. नवी मुंबईमध्ये मात्र कचराही वेळेवर उचलला जातो व देशातील आदर्श डंपिंग ग्राउंडही याच शहरामध्ये आहे. परंतु डंपिंग ग्राउंडची क्षमता संपली असून नवीन जागा अद्याप शासनाकडून मिळालेली नाही. यामुळे भविष्यात नवी मुंबईलाही कचºयाची विल्हेवाट लावण्याची समस्या भेडसावणार आहे. यामुळेच तुकाराम मुंढे आयुक्त असताना त्यांनी ओला व सुका कचरा वेगळा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वर्गीकरण न केलेल्या सोसायट्यांमधील कचरा न उचलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तेव्हा नागरिकांनी जनजागृतीसाठी अजून कालावधी मिळावा, अशी मागणी केली होती. विद्यमान आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनीही सहा महिन्यांपासून कचरा वर्गीकरणावर विशेष लक्ष दिले आहे. शहरामध्ये मोठ्याप्रमाणात जनजागृती केली जात आहे. नियमित स्वच्छता मोहिमा राबविल्या जात आहेत. नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी वारंवार सूचना करूनही वर्गीकरण केले जात नसल्याने आता कडक भूमिका घेण्यास सुरवात केली आहे. २४ आॅक्टोबरपासून वर्गीकरण केलेल्या सोसायट्यांमधील कचरा उचललेला नाही. यापुढे कचरा वर्गीकरण झाले तरच उचलला जाईल अशी ठाम भूमिका प्रशासनाने घेतली आहे.महापालिका क्षेत्रामध्ये रोज सरासरी ७०० टन कचरा निर्माण होत आहे. यामधील ५० ते ६० टक्के कचºयाचे वर्गीकरण होत आहे. ४० ते ५० टक्के कचºयाचे अद्याप वर्गीकरण होत नाही. ओला व सुका कचरा एकत्रच टाकल्याने महापालिकेच्या यंत्रणेवर ताण पडत आहे. डंपिंग ग्राउंडवर कचरा वेगळा करावा लागत आहे. अनेक वेळा आहे तसाच कचरा टाकावा लागत आहे. महापालिकेतून मिळालेल्या माहितीप्रमाणे नेरूळ, वाशी व बेलापूर परिसरामध्ये ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे प्रमाण जास्त आहे.विशेष म्हणजे दिघा या पूर्णपणे झोपडपट्टी परिसर असलेल्या विभागामध्ये ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे प्रमाण जास्त आहे. तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली नोडमध्ये अद्याप अपेक्षितपणे कचरा वर्गीकरण होत नाही.कचरा वर्गीकरण ही प्रत्येकाची जबाबदारी असून पालिकेच्या या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.>दिघावासीयांचा आदर्शसद्यस्थितीमध्ये शहरामध्ये५० ते ६० टक्के कचºयाचे वर्गीकरण केले जात आहे. नेरूळ, वाशी, सीबीडी या सिडको नोडमध्ये कचरा वर्गीकरण करण्याचे प्रमाण चांगले आहे. याशिवाय दिघा हा पूर्णपणे झोपडपट्टी असलेल्या विभागामध्ये नागरिक ओला व सुका कचरा मोठ्या प्रमाणात वेगळा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिघा मधील नागरिकांप्रमाणे सर्वच शहरवासीयांनी सहकार्य केले तर नवी मुंबईमध्ये शंभर टक्के कचरा वर्गीकरण करणे शक्य होईल, अशी माहिती अधिकाºयांनी दिली.>आयुक्तांचा पुढाकारघनकचरा व्यवस्थापनामध्ये आदर्श शहर असा नवी मुंबईचा नावलौकिक व्हावा यासाठी आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी जनजागृतीसह कचरा वर्गीकरणापर्यंत प्रत्येक गोष्टीवर लक्ष दिले आहे. घनकचरा उपआयुक्त तुषार पवार यांच्यासह सर्वच अधिकारी, कर्मचारी स्वच्छ नवी मुंबई मिशनसाठी प्रयत्न करत आहेत.>स्वच्छतेसाठीच्या स्पर्धेला मुदतवाढमहापालिकेने स्वच्छतेविषयी विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहे. ९ ते २८ आॅक्टोबरपर्यंत हॉटेल्स, हॉस्पिटल्स, गृहनिर्माण संस्था, मोहल्ला, मार्केट, मंडई, सार्वजनिक, सामुदायिक शौचालये, उद्यान व प्रभाग या आठ गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेमध्ये स्थळ परीक्षण व गुणांकन ३० आॅक्टोबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. विभाग स्तरावर पहिल्या ते दुसºया क्रमांकासाठी अनुक्रमे २५, १५ ते १० हजार रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे. शाळा गटासाठी १५ व १० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. महापालिका स्तरावरील स्पर्धेसाठी गृहनिर्माण सोसायट्यांसाठी १ लाख, ७५ हजार व ५० हजार रूपये बक्षीस देण्यात येणार आहे. शाळांसाठी अनुक्रमे २५ व २० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.>केंद्र शासनाच्या नियमांप्रमाणे कचरा निर्मितीच्या ठिकाणीच ओला व सुका कचरा वेगळा करणे आवश्यक आहे. दोन वर्षांपासून महापालिका नागरिकांना आवाहन करत आहे. अनेकांनी वर्गीकरण सुरूही केले आहे. परंतु वारंवार सूचना देवूनही वर्गीकरण न करणाºया सोसायटीमधील कचरा न उचलण्याचा निर्णय घेतला आहे.- अंकुश चव्हाण,अतिरिक्त आयुक्त, महापालिका