शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

तळोजातील १८ कारखानेच बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 03:18 IST

हरित लवादाच्या माध्यमातून तळोजा एमआयडीसीमधील ३५0 रासायनिक कारखाने बंद करण्याचा कोणताच निर्णय घेतला गेलेला नाही

पनवेल : हरित लवादाच्या माध्यमातून तळोजा एमआयडीसीमधील ३५0 रासायनिक कारखाने बंद करण्याचा कोणताच निर्णय घेतला गेलेला नाही. केवळ १८ कारखान्यांना बंद करण्याचे आदेश दिलेले असून उर्वरित कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस दिली असल्याचे सांगत चुकीच्या माहितीमुळे तळोजा एमआयडीसीमधील कारखानदारांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे दि. १ रोजी टीएमएने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.तळोजा एमआयडीसीमध्ये होत असलेल्या प्रदूषणासंदर्भात नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादात धाव घेतली आहे. या याचिकेवर दि. ३0 रोजी सुनावणी वेळी हरित लवादाने तळोजा एमआयडीसीमधील ३५0 रासायनिक कारखाने बंद करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांना दिली. मात्र हे वृत्त खोटे असून या वृत्तामुळे तळोजा एमआयडीसीमधील कारखानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अशाप्रकारे कोणताच निर्णय हरित लवादाने घेतलेला नसून केवळ १८ कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला असून उर्वरित कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या सचिव जयश्री काटकर यांनी स्पष्ट केले. तसेच ५ कोटी दंड भरण्याचे आदेश हरित लवादाने दिलेले नसून संबंधित रक्कम डिपॉजिट करण्यास सांगितले असल्याचे टीएमएचे श्यामसुंदर कारकून यांनी स्पष्ट केले. या सुनावणीदरम्यान मी स्वत: दिल्लीला उपस्थित असल्यानेसध्या प्रसार माध्यमामध्ये सुरूअसलेले वृत्त खोटे असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकरणी याचिकाकर्ते अरविंद म्हात्रे ही मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शनिवार, रविवार सुट्या असल्याने संबंधित आदेशाची प्रत प्राप्त झालेली नाही. सोमवारी संबंधित आदेश लेखी स्वरूपात हातात पडल्यावर या प्रकरणी मी दिलेली माहिती सर्वांसमोर येईल.