शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

किरकोळ मार्केटमध्ये कांदा ६० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:05 IST

राज्यभर कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे. मुंबईमध्ये गुरुवारी फक्त ५० ट्रकचीच आवक झाली

नवी मुंबई : राज्यभर कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे. मुंबईमध्ये गुरुवारी फक्त ५० ट्रकचीच आवक झाली असून होलसेल मार्केटमध्ये दर ३७ ते ४५ रुपये किलो झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ५० ते ६० रुपये किलो दराने विकला जात असून पुढील काही दिवसांमध्ये हे दर अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.राज्यभर सुरू असलेल्या पावसाचा परिणाम कांदा उत्पादनावरही होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवीन पीक येण्यास विलंब होणार आहे. कर्नाटकमधून येणारा लांब कांदाही अद्याप मुंबईमध्ये आलेला नाही. या सर्वांचा परिणाम बाजारभावावर होऊ लागला आहे. गुरुवारी मुंबईमध्ये जेमतेम ५० वाहनांचीच आवक झाली. फक्त ८२६ टन कांदाच विक्रीसाठी आला आहे. आवक ५० टक्के घसरल्याने दर मोठ्या प्रमाणात वाढले.होलसेल मार्केटमध्येच कांद्याची ३७ ते ४५ रुपये किलो दराने विक्री झाली. नवी मुंबईमधील किरकोळ मार्केटमध्ये कांदा ५० ते ६० रुपये किलो दराने विकला जात होता. कांद्याचा तुटवडा सुरूच राहिला तर पुढील काही दिवसांमध्ये भाव अजून वाढतील, अशी शक्यताही येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.मुंबईमध्ये पुणे व नाशिक परिसरातून कांद्याची आवक होत आहे. पुणे बाजार समितीमध्येही कांदा २५ ते ३८ रुपये किलो दराने विकला जात आहे. नाशिकमध्ये २३ ते ४७ रुपये व लासलगावच्या दोन्ही बाजारपेठेमध्ये १५ ते ४६ रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे.कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्येच दर मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे त्याचा परिणाम मुंबईवरही मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये मुंबई बाजार समितीमधील दरही आणखी वाढण्याची शक्यता असून कांदा ग्राहकांना रडविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.>लासलगावला विक्रमी ५१ रुपये भावनाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी पाटोदा येथील शेतकरी लिलाबाई अशोक बोराडे यांच्या ९ क्विंटल ७० किलो उन्हाळ कांद्याला या वर्षीचा विक्रमी ५,१०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.सोमवारी बाजार समितीत १,०५० वाहनांतून कांदा विक्रीस आला होता. आवक कमी असल्याने व मागणी जास्त असल्याने व्यापाऱ्यांनी चढ्या बोली लावल्या. उन्हाळ कांद्याला १,३०० ते ५,१०० व सर्वसाधारण ४,००० रुपये भाव मिळाला. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी भावात तेजी होती. जिल्ह्यात सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आवक कमी झाली आहे. त्यातच आंध्र प्रदेशात तीन दिवसांपासून मोठा पाऊस सुरू आहे. त्यामुळे कुर्नुलसह तेथील इतर बाजारपेठेत आवक कमी झाली आहे. परिणामी महाराष्ट्रात भावात वाढ झाली आहे. बुधवारी लासलगाव येथील बाजारपेठेत सर्वाधिक ३,६४८, तर विंचूर येथे ४,००० रुपये क्विंटल भाव जाहीर झाला होता. बुधवारी ४६१ वाहनातून कांदा आवक झाली होती.>बाजार समितीमधील कांद्याचे दरमहिना दर (प्रतिकिलो)मार्च ०७ ते ०९एप्रिल ०७ ते ०९जून १२ ते १६महिना दर (प्रतिकिलो)जुलै ११ ते १४आॅगस्ट १७ ते २२१९ सप्टेंबर ३७ ते ४५>राज्यातील बाजार समितीमधील गुरुवारचे दरबाजार समिती दरमुंबई ३७ ते ४५नागपूर १९ ते २९पुणे २५ ते ३८बाजार समिती दरनाशिक ३२ ते ४७लासलगाव १५ ते ४६सातारा १० ते ३८>पुणे व नाशिकमधून कांद्याची आवक होत आहे. कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्येही कांदा चाळीशीच्या पुढे गेला आहे. आवक कमी असल्यामुळे मुंबईतही कांद्याचे दर वाढत आहेत.- दिगंबर राऊत,कांदा व्यापारी, एपीएमसीबाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी होत असून, तेथे रोज बाजारभाव वाढत आहेत. यामुळे किरकोळ मार्केटमधील दरही वाढत आहेत. आवक सुरळीत होईपर्यंत तेजी कायम राहील.- बाबू घाग, किरकोळ भाजीविक्रेते