शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी १०० दिवसामध्ये मार्गी लावणार, पणनमंत्री अब्दूल सत्तार यांची पाहणी

By नामदेव मोरे | Updated: August 23, 2023 19:55 IST

धोकादायक मार्केटची केली पाहणी

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अतीधोकादायक कांदा - बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा प्रश्न १०० दिवसामध्ये मार्गी लावणार. व्यापारी व प्रशासन सर्वांना विश्वासात घेऊन पुनर्बांधणीचे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन पणनमंत्री अब्दूल सत्तार यांनी दिले आहे.

व्यापारी, कामगार व मार्केटमधील समस्या समजून घेण्यासाठी अब्दूल सत्तार यांनी बाजार समितीला भेट दिली. प्रशासनासह व्यापारी संघटनांशी चर्चा केल्यानंतर प्रत्यक्ष मार्केटची पाहणी केली. कांदा- बटाटा मार्केटमध्ये ठिकठिकाणी टेकू लावण्यात आले आहेत. छताचे प्लास्टर निखळले आहे. पिलरलाही तडे गेले आहेत.

धक्यांच्या वरील छताचे प्लास्टर वारंवार कोसळत आहे. मार्केटची अवस्था पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली. कोणत्याहीक्षणी मार्केट कोसळण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेनेही मार्केट धोकदायक घोषीत केले आहे. मार्केटची पुनर्बांधणी करण्यासाठी एक महिन्यात सर्व घटकांशी चर्चा करून ठोस निर्णय घेतला जाईल व पुढील १०० दिवसांमध्ये पुनर्बांधणीच्या विषयावर तोडका काढला जाईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट याठिकाणी उभारण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

कांदा बटाटा मार्केटबरोबर फळ, मसाला, भाजीपाला व धान्य मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या समस्याही समजून घेतल्या. पाचही मार्केटमधील प्रश्न सोडविण्यासाठी गुरूवारी ३० ऑगस्टला मंत्रालयात बैठकी आयोजीत केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सभापती अशोक डक, सचीव राजेश भुसारी, निलेश विरा, विजय भुत्ता, संजय पिंगळे, बाळासाहेब बेंडे उपस्थित होते. व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांसमोरील अडचणी मांडल्या. मार्केटमध्ये एक नियम व मार्केट बाहेर दुसरा नियम नको. सर्वांना नियमन लागू करा किंवा आम्हालाही नियमनातून वगळा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

व्यापाऱ्यांचे आंदोलन मागेकांदा -बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी गुरूवारी २४ ऑगस्टला एक दिवसाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पणन मंत्र्यांनी मार्केटला भेट देवून चर्चा केल्यानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारNavi Mumbaiनवी मुंबई