शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी १०० दिवसामध्ये मार्गी लावणार, पणनमंत्री अब्दूल सत्तार यांची पाहणी

By नामदेव मोरे | Updated: August 23, 2023 19:55 IST

धोकादायक मार्केटची केली पाहणी

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अतीधोकादायक कांदा - बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा प्रश्न १०० दिवसामध्ये मार्गी लावणार. व्यापारी व प्रशासन सर्वांना विश्वासात घेऊन पुनर्बांधणीचे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन पणनमंत्री अब्दूल सत्तार यांनी दिले आहे.

व्यापारी, कामगार व मार्केटमधील समस्या समजून घेण्यासाठी अब्दूल सत्तार यांनी बाजार समितीला भेट दिली. प्रशासनासह व्यापारी संघटनांशी चर्चा केल्यानंतर प्रत्यक्ष मार्केटची पाहणी केली. कांदा- बटाटा मार्केटमध्ये ठिकठिकाणी टेकू लावण्यात आले आहेत. छताचे प्लास्टर निखळले आहे. पिलरलाही तडे गेले आहेत.

धक्यांच्या वरील छताचे प्लास्टर वारंवार कोसळत आहे. मार्केटची अवस्था पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली. कोणत्याहीक्षणी मार्केट कोसळण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेनेही मार्केट धोकदायक घोषीत केले आहे. मार्केटची पुनर्बांधणी करण्यासाठी एक महिन्यात सर्व घटकांशी चर्चा करून ठोस निर्णय घेतला जाईल व पुढील १०० दिवसांमध्ये पुनर्बांधणीच्या विषयावर तोडका काढला जाईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट याठिकाणी उभारण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

कांदा बटाटा मार्केटबरोबर फळ, मसाला, भाजीपाला व धान्य मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या समस्याही समजून घेतल्या. पाचही मार्केटमधील प्रश्न सोडविण्यासाठी गुरूवारी ३० ऑगस्टला मंत्रालयात बैठकी आयोजीत केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सभापती अशोक डक, सचीव राजेश भुसारी, निलेश विरा, विजय भुत्ता, संजय पिंगळे, बाळासाहेब बेंडे उपस्थित होते. व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांसमोरील अडचणी मांडल्या. मार्केटमध्ये एक नियम व मार्केट बाहेर दुसरा नियम नको. सर्वांना नियमन लागू करा किंवा आम्हालाही नियमनातून वगळा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

व्यापाऱ्यांचे आंदोलन मागेकांदा -बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी गुरूवारी २४ ऑगस्टला एक दिवसाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पणन मंत्र्यांनी मार्केटला भेट देवून चर्चा केल्यानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारNavi Mumbaiनवी मुंबई