शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये वन-वे नावालाच; शहरातील घडी विस्कटली, नागरिकांसह वाहतूक पोलीस जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 23:20 IST

नागरिकांसह वाहतूक पोलीस जबाबदार

वैभव गायकरपनवेल : पनवेल शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा पनवेल शहरात असल्याने दिवसेंदिवस वाढती वाहने, अरुंद रस्ते यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे शहरातील वनवे केवळ नावालाच उरला असून नागरिकदेखील सर्रास वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत आहेत. 

शहरातील जय भारत नाका परिसरात केवळ वनवेचा बोर्ड लागला आहे. मात्र नियमांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.   जय भारत नाका येथील वनवेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दुचाकीस्वाराला २०० व चारचाकी वाहनाला ३०० रुपये दंड आहे. मात्र वाहतूक पोलीस या ठिकाणी फिरकत नसल्याचे चित्र दिसत आहे. पनवेल शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती, पालिका मुख्यालय, न्यायालये, तलाठी कार्यालय, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त कार्यालय, दोन पोलीस ठाणी, पंचायत समिती कार्यालय तसेच मोठ्या प्रमाणात व्यापारी दुकाने आहेत. यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा शहरात असते.

शहरातील अरुंद रस्त्यांबाबत पालिकेने अद्यापही मास्टर प्लॅन तयार केला नसल्याने कित्येक वर्षे जुन्या अरुंद रस्त्यावरून वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. मागील वर्षात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात आहेत. शहरातील पार्किंगसाठी भूखंड अपुरे आहेत. त्यातच मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीची समस्या शहरात गंभीर होत चालली आहे. 

टॅग्स :panvelपनवेल