शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पनवेलमध्ये वन-वे नावालाच; शहरातील घडी विस्कटली, नागरिकांसह वाहतूक पोलीस जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 23:20 IST

नागरिकांसह वाहतूक पोलीस जबाबदार

वैभव गायकरपनवेल : पनवेल शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा पनवेल शहरात असल्याने दिवसेंदिवस वाढती वाहने, अरुंद रस्ते यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे शहरातील वनवे केवळ नावालाच उरला असून नागरिकदेखील सर्रास वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत आहेत. 

शहरातील जय भारत नाका परिसरात केवळ वनवेचा बोर्ड लागला आहे. मात्र नियमांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.   जय भारत नाका येथील वनवेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दुचाकीस्वाराला २०० व चारचाकी वाहनाला ३०० रुपये दंड आहे. मात्र वाहतूक पोलीस या ठिकाणी फिरकत नसल्याचे चित्र दिसत आहे. पनवेल शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती, पालिका मुख्यालय, न्यायालये, तलाठी कार्यालय, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त कार्यालय, दोन पोलीस ठाणी, पंचायत समिती कार्यालय तसेच मोठ्या प्रमाणात व्यापारी दुकाने आहेत. यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा शहरात असते.

शहरातील अरुंद रस्त्यांबाबत पालिकेने अद्यापही मास्टर प्लॅन तयार केला नसल्याने कित्येक वर्षे जुन्या अरुंद रस्त्यावरून वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. मागील वर्षात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात आहेत. शहरातील पार्किंगसाठी भूखंड अपुरे आहेत. त्यातच मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीची समस्या शहरात गंभीर होत चालली आहे. 

टॅग्स :panvelपनवेल