शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

दहा हजार नागरिकांमागे एक पोलीस

By admin | Updated: November 16, 2015 02:14 IST

ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या मीरा-भार्इंदर पोलीस डिव्हीजन क्षेत्रात असलेल्या सहा ठाण्यांतर्गत सुमारे ५०० ते ५५० कर्मचारी कार्यरत असल्याने शहरातील सुमारे १२ लाख लोकसंख्येच्या तुलनेने हे मनुष्यबळ अत्यंत

राजू काळे,  भार्इंदरठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या मीरा-भार्इंदर पोलीस डिव्हीजन क्षेत्रात असलेल्या सहा ठाण्यांतर्गत सुमारे ५०० ते ५५० कर्मचारी कार्यरत असल्याने शहरातील सुमारे १२ लाख लोकसंख्येच्या तुलनेने हे मनुष्यबळ अत्यंत तोकडे आहे. सुमारे १० हजार नागरिकांमागे एक पोलीस सुरक्षेचे काम पाहत असल्याचे वास्तव उजेडात आले आहे. मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यास लागून असलेल्या मीरा-भार्इंदर शहराचा विकास झपाट्याने होत असून येथील लोकवस्तीदेखील दिवसेंदिवस विस्तारत आहे. या वाढत्या लोकवस्तीत सुमारे १२ लाखांहून अधिक लोकसंख्या वास्तव्य करीत असून त्यात स्थलांतरित लोकांची आणखी भर पडत आहे. येथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने सुरुवातीला तीन पोलीस ठाणी सुरू केली होती. त्यानंतर, त्यांची संख्या एकामागोमाग वाढत जाऊन आजमितीस ती सहावर पोहोचली आहे. त्यांच्या हद्दीत सरासरी लोकसंख्येची घनता लाखोंच्या घरात असून सुरक्षिततेसाठी सुमारे ४० ते १२० कर्मचारी प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत आहेत. यापैकी सुमारे ४ ते २० कर्मचारी अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक, उपअधीक्षक कार्यालयीन कामकाजाकरिता नियुक्त केल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांपैकी काही जण साप्ताहिक सुटी व हक्काच्या रजेवर जात असल्याने दैनंदिन कामकाजाकरिता प्रत्येक पोलीस ठाण्यात सुमारे ३० ते ४५ कर्मचारीच उपलब्ध होत असतात. त्यांना प्रत्येकी १२ तासांच्या दोन पाळ्यांत काम करावे लागत असल्याने त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्यातच लोकसंख्येच्या तुलनेत १० हजार नागरिकांमागे एका पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्य पार पाडावे लागत असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात कर्तव्यावर असलेल्या मनुष्यबळावरून सुमारे २० ते २५ हजार नागरिकांमागे एक पोलीस कर्मचारी आहे. राज्य शासनाकडून मार्च २०१४ च्या अध्यादेशानुसार ठाणे ग्रामीण पोलिसांसाठी ४५२ पदे मंजूर झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या तारांकित प्रश्नावर स्पष्ट केले.