शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

दहा हजार नागरिकांमागे एक पोलीस

By admin | Updated: November 16, 2015 02:14 IST

ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या मीरा-भार्इंदर पोलीस डिव्हीजन क्षेत्रात असलेल्या सहा ठाण्यांतर्गत सुमारे ५०० ते ५५० कर्मचारी कार्यरत असल्याने शहरातील सुमारे १२ लाख लोकसंख्येच्या तुलनेने हे मनुष्यबळ अत्यंत

राजू काळे,  भार्इंदरठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या मीरा-भार्इंदर पोलीस डिव्हीजन क्षेत्रात असलेल्या सहा ठाण्यांतर्गत सुमारे ५०० ते ५५० कर्मचारी कार्यरत असल्याने शहरातील सुमारे १२ लाख लोकसंख्येच्या तुलनेने हे मनुष्यबळ अत्यंत तोकडे आहे. सुमारे १० हजार नागरिकांमागे एक पोलीस सुरक्षेचे काम पाहत असल्याचे वास्तव उजेडात आले आहे. मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यास लागून असलेल्या मीरा-भार्इंदर शहराचा विकास झपाट्याने होत असून येथील लोकवस्तीदेखील दिवसेंदिवस विस्तारत आहे. या वाढत्या लोकवस्तीत सुमारे १२ लाखांहून अधिक लोकसंख्या वास्तव्य करीत असून त्यात स्थलांतरित लोकांची आणखी भर पडत आहे. येथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने सुरुवातीला तीन पोलीस ठाणी सुरू केली होती. त्यानंतर, त्यांची संख्या एकामागोमाग वाढत जाऊन आजमितीस ती सहावर पोहोचली आहे. त्यांच्या हद्दीत सरासरी लोकसंख्येची घनता लाखोंच्या घरात असून सुरक्षिततेसाठी सुमारे ४० ते १२० कर्मचारी प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत आहेत. यापैकी सुमारे ४ ते २० कर्मचारी अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक, उपअधीक्षक कार्यालयीन कामकाजाकरिता नियुक्त केल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांपैकी काही जण साप्ताहिक सुटी व हक्काच्या रजेवर जात असल्याने दैनंदिन कामकाजाकरिता प्रत्येक पोलीस ठाण्यात सुमारे ३० ते ४५ कर्मचारीच उपलब्ध होत असतात. त्यांना प्रत्येकी १२ तासांच्या दोन पाळ्यांत काम करावे लागत असल्याने त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्यातच लोकसंख्येच्या तुलनेत १० हजार नागरिकांमागे एका पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्य पार पाडावे लागत असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात कर्तव्यावर असलेल्या मनुष्यबळावरून सुमारे २० ते २५ हजार नागरिकांमागे एक पोलीस कर्मचारी आहे. राज्य शासनाकडून मार्च २०१४ च्या अध्यादेशानुसार ठाणे ग्रामीण पोलिसांसाठी ४५२ पदे मंजूर झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या तारांकित प्रश्नावर स्पष्ट केले.