शहरं
Join us  
Trending Stories
1
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
2
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
4
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
5
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
6
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
7
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
9
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
10
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
11
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
12
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
13
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
14
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
15
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
16
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
17
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
18
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
19
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
20
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

देशात एक लाख परिचारिकांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2016 02:33 IST

आरोग्य क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्यामुळे आयुर्मान वाढण्यास मदत होत आहे, पण रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांवर दिवसेंदिवस कामाचे ओझे वाढतच आहे.

मुंबई: आरोग्य क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्यामुळे आयुर्मान वाढण्यास मदत होत आहे, पण रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांवर दिवसेंदिवस कामाचे ओझे वाढतच आहे. देशातील परिचारिकांची संख्या सुमारे १ लाख असून, आरोग्य क्षेत्रात अजूनही १ लाख परिचारिकांची आवश्यकता आहे. सध्या सुरू असलेल्या परिचारिकांच्या अभ्यासक्रमाच्या जागांचा विचार केल्यास १ लाख परिचारिका तयार होण्यास तब्बल १० वर्षांचा कालावधी लागेल, असे मत महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष रामलिंग माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दरवर्षी १६ हजार ५०० परिचारिका अभ्यासक्रम पूर्ण करतात. हा वेग कमी आहे. त्यामुळे परिचारिकांची गरज पूर्ण करण्यासाठी मोठा काळ जावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांत परिचारिका क्षेत्रात असलेल्या विविध संधींचा विचार होताना दिसत नाही. परिचारिका क्षेत्राविषयी मर्यादित माहिती मिळत असल्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. मात्र, हे सत्य नाही. परिचारिका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना भविष्यात अनेक संधी आहेत. त्यांनी स्पेशलाइज अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात, असेही माळी यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या सरचिटणीस कमल वायकोळ यांनीदेखील परिचारिकांची संख्या कमी होत असल्यामुळे परिचारिकांवर पडणाऱ्या ताणाविषयी सांगितले. राज्यातील जिल्हा रुग्णालयात परिचारिकांची संख्या कमी आहे. त्यातच काही वर्षांपूर्वी ‘सिस्टर इन्चार्ज’ हे पद रद्द केले. राज्यातील ७५० पदे रद्द झाली. त्यामुळे रुग्णालयातील वरिष्ठ परिचारिकेला ‘सिस्टर इन्चार्ज’चे म्हणजे प्रशासकीय कामकाजासह रुग्णसेवा अशी दोन्ही कामे सांभाळावी लागत आहेत. सध्या राज्यातील जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयात १३ हजार परिचारिका कार्यरत आहेत. कौन्सिलच्या गुणोत्तरानुसार ९ रुग्णांमागे एक परिचारिका कार्यरत हवी, पण हे गुणोत्तर पूर्ण होत नाही. एका परिचारिकेवर कामाच्या अतिरिक्त ताणामुळे त्याचा परिणाम तिच्या कुटुंबावरदेखील होतो. रुग्णसेवा करताना परिचारिकेना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रुग्णांच्या औषधांची वेळ सांभाळत त्यांची शुश्रूषा करावी लागते. त्याच इतर कामाकडेही लक्ष द्यावे लागते. या सगळ््या कामाच्या ताणाचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होत आहे. त्यामुळे परिचारिकांची पदे वाढवावीत, ती भरली जावीत हे आपले प्रमुख म्हणणे असल्याचे वायकोळ यांनी स्पष्ट केले.