शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

देशात एक लाख परिचारिकांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2016 02:33 IST

आरोग्य क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्यामुळे आयुर्मान वाढण्यास मदत होत आहे, पण रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांवर दिवसेंदिवस कामाचे ओझे वाढतच आहे.

मुंबई: आरोग्य क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्यामुळे आयुर्मान वाढण्यास मदत होत आहे, पण रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांवर दिवसेंदिवस कामाचे ओझे वाढतच आहे. देशातील परिचारिकांची संख्या सुमारे १ लाख असून, आरोग्य क्षेत्रात अजूनही १ लाख परिचारिकांची आवश्यकता आहे. सध्या सुरू असलेल्या परिचारिकांच्या अभ्यासक्रमाच्या जागांचा विचार केल्यास १ लाख परिचारिका तयार होण्यास तब्बल १० वर्षांचा कालावधी लागेल, असे मत महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष रामलिंग माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दरवर्षी १६ हजार ५०० परिचारिका अभ्यासक्रम पूर्ण करतात. हा वेग कमी आहे. त्यामुळे परिचारिकांची गरज पूर्ण करण्यासाठी मोठा काळ जावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांत परिचारिका क्षेत्रात असलेल्या विविध संधींचा विचार होताना दिसत नाही. परिचारिका क्षेत्राविषयी मर्यादित माहिती मिळत असल्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. मात्र, हे सत्य नाही. परिचारिका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना भविष्यात अनेक संधी आहेत. त्यांनी स्पेशलाइज अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात, असेही माळी यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या सरचिटणीस कमल वायकोळ यांनीदेखील परिचारिकांची संख्या कमी होत असल्यामुळे परिचारिकांवर पडणाऱ्या ताणाविषयी सांगितले. राज्यातील जिल्हा रुग्णालयात परिचारिकांची संख्या कमी आहे. त्यातच काही वर्षांपूर्वी ‘सिस्टर इन्चार्ज’ हे पद रद्द केले. राज्यातील ७५० पदे रद्द झाली. त्यामुळे रुग्णालयातील वरिष्ठ परिचारिकेला ‘सिस्टर इन्चार्ज’चे म्हणजे प्रशासकीय कामकाजासह रुग्णसेवा अशी दोन्ही कामे सांभाळावी लागत आहेत. सध्या राज्यातील जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयात १३ हजार परिचारिका कार्यरत आहेत. कौन्सिलच्या गुणोत्तरानुसार ९ रुग्णांमागे एक परिचारिका कार्यरत हवी, पण हे गुणोत्तर पूर्ण होत नाही. एका परिचारिकेवर कामाच्या अतिरिक्त ताणामुळे त्याचा परिणाम तिच्या कुटुंबावरदेखील होतो. रुग्णसेवा करताना परिचारिकेना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रुग्णांच्या औषधांची वेळ सांभाळत त्यांची शुश्रूषा करावी लागते. त्याच इतर कामाकडेही लक्ष द्यावे लागते. या सगळ््या कामाच्या ताणाचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होत आहे. त्यामुळे परिचारिकांची पदे वाढवावीत, ती भरली जावीत हे आपले प्रमुख म्हणणे असल्याचे वायकोळ यांनी स्पष्ट केले.