शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

महाडमध्ये टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:38 PM

प्रस्ताव मंजुरीस विलंब : १३ गावे ७१ वाड्यांना सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा

महाड : तालुक्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढत आहे. जर पाऊस लांबला तर टंचाईगस्त गाव व वाड्यांना पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. टंचाईग्रस्त गावांकडून आलेले प्रस्ताव मंजूर होण्यास विलंब होत असल्याने सर्वसामान्य जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या तालुक्यात १३ गावे आणि ७१ वाड्या यांना सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, एक गाव व ३० वाड्यांचे प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी आणखी दोन टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी पंचायत समितीमार्फत करण्यात आली आहे.

महाड तालुक्यातील पिंपळकोंड, शेवते, आडी, घुरुपकोंड, साकडी, पुनाडेगाव, सापे तर्फे तुडील, ताम्हाणे अशी १३ गावे आणि ७१ वाड्यांना सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या गावांना लोकसंख्येच्या आधारावर एक अथवा दोन दिवसांआड टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, काही वाड्यांमध्ये टँकरने आलेले पाणी साठवून ठेवण्यासाठी साठवण टाक्या नसल्याने घरातील हंडे व इतर भांड्यातून पाणी भरून त्यावर ग्रामस्थांना समाधान मानावे लागत आहे.

हंड्यामधून पाण्याचे वाटप करताना पाण्याचा अपव्यय जास्त होऊन वेळही जास्त द्यावा लागत असतो. शासनाने अशा गावांमधून साठवण टाक्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे. या खेरीज एक गाव आणि ३० वाड्यांनी पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव महाड पंचायत समितीकडे पाठविले असून, हे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव तातडीने मंजूर होत नसल्याने या गाव-वाड्यांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.