शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

चळवळीची धुरा आता युवकांवर

By admin | Updated: January 26, 2016 02:04 IST

पनवेल, नवी मुंबई, उरणमधील प्रकल्पग्रस्तांचा एकही प्रश्न संघर्ष न करता सुटलेला नाही. येथील भूमिपुत्रांचा लढा देशातील इतर प्रकल्पबाधितांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे

नामदेव मोरे , नवी मुंबईपनवेल, नवी मुंबई, उरणमधील प्रकल्पग्रस्तांचा एकही प्रश्न संघर्ष न करता सुटलेला नाही. येथील भूमिपुत्रांचा लढा देशातील इतर प्रकल्पबाधितांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे. दि. बा. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण आयुष्य या चळवळीसाठी खर्च केले. आता या चळवळीची धुरा युवकांनी खांद्यावर घेतली असून घरबचाव, रोजगारापासून सर्व प्रश्न सोडविण्यासाठीची धडपड सुरू केली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर नवी मुंबईची उभारणी झाली आहे. भूमिपुत्रांनी तब्बल १७ हजार हेक्टर जमीन शहर वसविण्यासाठी दिली. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत, विमानतळ, जेएनपीटी, तळोजा परिसरातील एमआयडीसी सर्व प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांनी त्यांची जमीन दिली. या बदल्यात शासनाने अत्यंत अल्प मोबदला दिला. जवळपास ५० वर्षांपासून प्रकल्पग्रस्त न्याय हक्कासाठी भांडत आहेत. जमिनीचा वाढीव मोबदला, साडेबारा टक्के जमीन, मिठागार कामगार व बलुतेदार यांचे भूखंड, एमआयडीसी व जेएनपीटीमुळे विस्थापित झालेल्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्षच करावा लागला. विनासंघर्ष काहीच द्यायचेच नाही असा अलिखित नियम असल्याप्रमाणेच शासकीय यंत्रणांचा कारभार राहिला आहे. येथील भूमिपुत्रही संघर्षाला कधीच घाबरले नाहीत. जंगल सत्याग्रह व दास्तान फाट्यावरील लढ्यात एकूण १७ जण शहीद झाले आहेत. घणसोलीमधील अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी साडेबारा टक्के योजना, गरजेपोटी बांधलेली घरे, विमानतळ व इतर प्रकल्पांना कडवा विरोध केला. प्रत्येक आंदोलनामध्ये शासनाला झुकावेच लागले. पण सिडको व शासनाच्या अजेंड्यावर प्रकल्पग्रस्तांना प्रथम प्राधान्य कधीच मिळाले नाही. भूमिपुत्रांचा लढा उभा करणारे दि. बा. पाटील आज नाहीत. परंतु त्यांच्या व आतापर्यंत या चळवळीसाठी रक्त सांडलेल्या शेतकऱ्यांच्या आठवणी प्रत्येकाला लढण्याचे बळ देत आहेत. कोळी युथ फाऊंडेशनने ही चळवळ पुढे नेण्यासाठीचा प्रयत्न सुरू केला आहे. उच्चविद्याविभूषित तरुण या लढ्यात सहभागी होत आहेत. चार्टर्ड अकाऊंटंट, वकील व इतर अनेक सुशिक्षित तरुणांनी पुन्हा एकदा भूमिपुत्रांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. नवी मुंबईमध्ये प्रत्येक इमारतीमध्ये छोटे - मोठे अतिक्रमण झाले आहे. परंतु सिडको फक्त प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवरच बुलडोझर फिरवत आहे. वर्षभरात ६८ बांधकामांवरील कारवाई थांबविण्यात यश आले आहे. अ‍ॅड. राहुल ठाकूर यांनी उच्च न्यायालयात चांजेमधील प्रकल्पग्रस्तांची बाजू मांडून शंभर टक्के जमीन परत मिळविली आहे. युथ फाऊंडेशनने तीन महिने परिश्रम करून स्मार्ट व्हिलेजचा आराखडा तयार केला आहे.