शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

चळवळीची धुरा आता युवकांवर

By admin | Updated: January 26, 2016 02:04 IST

पनवेल, नवी मुंबई, उरणमधील प्रकल्पग्रस्तांचा एकही प्रश्न संघर्ष न करता सुटलेला नाही. येथील भूमिपुत्रांचा लढा देशातील इतर प्रकल्पबाधितांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे

नामदेव मोरे , नवी मुंबईपनवेल, नवी मुंबई, उरणमधील प्रकल्पग्रस्तांचा एकही प्रश्न संघर्ष न करता सुटलेला नाही. येथील भूमिपुत्रांचा लढा देशातील इतर प्रकल्पबाधितांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे. दि. बा. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण आयुष्य या चळवळीसाठी खर्च केले. आता या चळवळीची धुरा युवकांनी खांद्यावर घेतली असून घरबचाव, रोजगारापासून सर्व प्रश्न सोडविण्यासाठीची धडपड सुरू केली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर नवी मुंबईची उभारणी झाली आहे. भूमिपुत्रांनी तब्बल १७ हजार हेक्टर जमीन शहर वसविण्यासाठी दिली. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत, विमानतळ, जेएनपीटी, तळोजा परिसरातील एमआयडीसी सर्व प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांनी त्यांची जमीन दिली. या बदल्यात शासनाने अत्यंत अल्प मोबदला दिला. जवळपास ५० वर्षांपासून प्रकल्पग्रस्त न्याय हक्कासाठी भांडत आहेत. जमिनीचा वाढीव मोबदला, साडेबारा टक्के जमीन, मिठागार कामगार व बलुतेदार यांचे भूखंड, एमआयडीसी व जेएनपीटीमुळे विस्थापित झालेल्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्षच करावा लागला. विनासंघर्ष काहीच द्यायचेच नाही असा अलिखित नियम असल्याप्रमाणेच शासकीय यंत्रणांचा कारभार राहिला आहे. येथील भूमिपुत्रही संघर्षाला कधीच घाबरले नाहीत. जंगल सत्याग्रह व दास्तान फाट्यावरील लढ्यात एकूण १७ जण शहीद झाले आहेत. घणसोलीमधील अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी साडेबारा टक्के योजना, गरजेपोटी बांधलेली घरे, विमानतळ व इतर प्रकल्पांना कडवा विरोध केला. प्रत्येक आंदोलनामध्ये शासनाला झुकावेच लागले. पण सिडको व शासनाच्या अजेंड्यावर प्रकल्पग्रस्तांना प्रथम प्राधान्य कधीच मिळाले नाही. भूमिपुत्रांचा लढा उभा करणारे दि. बा. पाटील आज नाहीत. परंतु त्यांच्या व आतापर्यंत या चळवळीसाठी रक्त सांडलेल्या शेतकऱ्यांच्या आठवणी प्रत्येकाला लढण्याचे बळ देत आहेत. कोळी युथ फाऊंडेशनने ही चळवळ पुढे नेण्यासाठीचा प्रयत्न सुरू केला आहे. उच्चविद्याविभूषित तरुण या लढ्यात सहभागी होत आहेत. चार्टर्ड अकाऊंटंट, वकील व इतर अनेक सुशिक्षित तरुणांनी पुन्हा एकदा भूमिपुत्रांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. नवी मुंबईमध्ये प्रत्येक इमारतीमध्ये छोटे - मोठे अतिक्रमण झाले आहे. परंतु सिडको फक्त प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवरच बुलडोझर फिरवत आहे. वर्षभरात ६८ बांधकामांवरील कारवाई थांबविण्यात यश आले आहे. अ‍ॅड. राहुल ठाकूर यांनी उच्च न्यायालयात चांजेमधील प्रकल्पग्रस्तांची बाजू मांडून शंभर टक्के जमीन परत मिळविली आहे. युथ फाऊंडेशनने तीन महिने परिश्रम करून स्मार्ट व्हिलेजचा आराखडा तयार केला आहे.