शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

धोकादायक वसाहतींना प्रशासनाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:54 IST

घरांचा वापर थांबविण्याच्या सूचना; एमआयडीसीसह पालिकेकडून उपाय

नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील डोंगर उतारावर वसलेल्या झोपडपट्टी परिसरात एमआयडीसीसह पालिकेने अपघाताची माहिती देणारे फलक लावले आहेत. धोकादायक घरांमध्ये वास्तव्य करू नये असे आवाहन करण्यात आले असून दुर्घटना टाळण्यासाठी ही उपाययोजना केली आहे.मुसळधार पावसामुळे शनिवारी गणपतीपाडा परिसरातील एक घर शनिवारी पडले.याशिवाय वाशीमधील वापरात नसलेली धोकादायक इमारतही कोसळली. यामुळे शहरातील इतर धोकादायक इमारती व औद्योगिक वसाहतीमध्ये डोंगर उतारावर वसलेल्या झोपड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. एमआयडीसीसह महापालिका प्रशासनाने सर्व धोकादायक वसाहतींच्या परिसरामध्ये अपघात होण्याची शक्यता असून येथील घरांचा वापर तत्काळ थांबविण्यात यावा अशी नोटीस दिली आहे. गणपतीपाडा मधील जवळपास ९ घरांना टाळे लावले आहेत. येथील नागरिकांना इतरत्र रहावे लागत आहे.महापालिका प्रशासनाने सुरक्षेसाठी फलक लावले असले तरी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. घरे खाली करण्यास भाग पाडले जाईल अशी भिती व्यक्त केली आहे. प्रशासनाच्यावतीने मात्र सुरक्षेसाठी या उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती दिली.अतीधोकादायक इमारती व डोंगर उतारावरील घरांना व वसाहतीच्या परिसरामध्ये धोक्याची पुर्वसुचना देणारे फलक व नोटीस लावण्यात आली आहे. दुर्घटना होवू नये यासाठी नागरिकांनी धोकादायक इमारतींचा वापर तत्काळ थांबवावा असे आवाहनही केले आहे.- दादासाहेब चाबुकस्वार उपायुक्त परिमंडळ -१