शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
7
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
8
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
9
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
10
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
11
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
12
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
13
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
14
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
15
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
16
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
17
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
18
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
19
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
20
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ५७९ इमारतींना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:28 IST

अग्निशमन नियमांचे उल्लंघन : पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा

नवी मुंबई : शहरातील अग्निशमन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारतींवर कडक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेने आतापर्यंत तब्बल ५७९ इमारतींना नोटीस पाठविली आहे. यानंतरही नियमांचे पालन न केल्यास संबंधित इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्येही इमारतींना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. शहरातील बैठ्या चाळींसह बहुमजली इमारतींना आग लागून जीवित व वित्तहानी झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. भविष्यातही या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आग लागलेल्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर अग्निशमन नियमांचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा उपाययोजना अधिनियम २००६ व नियम २००९ अन्वये प्रत्येक इमारतीमधील आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित असल्याबाबत शासन मान्यताप्राप्त लायसन्स अभिकरणामार्फत विहित नमुन्यातील प्रमाणपत्र अग्निशमन विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे.

महापालिकेनेही अग्निशमन नियमांचे तंतोतंत पालन केले जावे, असे आवाहन वेळोवेळी केले आहे; परंतु या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया तब्बल ५७९ इमारतींना नोटीस पाठविण्यात आली आहे. यामध्ये ५०० निवासी इमारतींचा समावेश आहे. १७ शाळा व महाविद्यालयांसह १८ रुग्णालयांनाही नोटीस पाठविली आहे. दोन मॉलमध्येही अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याने त्यांना नोटीस पाठविली असून एक महिन्यात ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नोटीस पाठविलेल्या इमारतधारकांनी एक महिन्यात आग विझविण्याची यंत्रणा कार्यान्वित केली नाही तर त्यांच्यावर कायद्यातील तरतुदीप्रमाणे कडक कारवाई केली जाणार आहे. संबंधितांचा वीजपुरवठा व पाणीपुरवठा थांबविण्यात येणार आहे. प्रत्येक सदनिकाधारकांनी तेथे राहणाºया नागरिकांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केटमध्ये नियमांचे उल्लंघन केले जात आहे. तेथे आग लागल्याच्या अनेक घटना घडल्यानंतरही प्रशासन व व्यापारी यांनी आग विझविण्यासाठी काहीही ठोस तरतूद केलेली नाही. अनेक रुग्णालयांमध्येही अशीच स्थिती आहे. आग लागल्यास रुग्णांना इमारतीच्या बाहेर काढणे अशक्य होणार आहे.

शाळा-महाविद्यालयांमध्ये आग लागल्यास आगीमुळे व पळताना चेंगरून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे. खासगी क्लासेससह नर्सरीचालकांकडूनही पुरेशी काळजी घेतली जातनसून त्यांनाही पालिकेने आवाहन केले आहे.