शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर भारतीय शिवसेनेसोबत- एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:34 IST

निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन

नवी मुंबई : शिवसेनेने कधीही उत्तर भारतीय नागरिकांना त्रास दिला नाही. ठाण्यामध्ये एका पक्षाने उत्तर भारतीयांना त्रास दिला, त्यांच्या गाड्या फोडल्या, त्यांच्या व्यवसायाची दुकाने तोडली, त्या वेळेस शिवसेना उत्तर भारतीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे उत्तर भारतीय समाज शिवसेनेच्या बाजूने उभा असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी शिंदे म्हणाले की ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे अनेक नगरसेवक उत्तर भारतीय आहेत. अयोध्येत उद्धव ठाकरे यांनी रामजन्मभूमीचे दर्शन घेतले. उत्तर भारतीयांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठ्या प्रमाणावर आकर्षण, आस्था आणि श्रद्धा आहे. कोणताही प्रसंग ओढवला तरी मदतीला सर्वात आधी धावून येणारा पक्ष शिवसेना असल्याचे सर्वांना माहीत आहे, त्यामुळे उत्तर भारतीय समाजाबरोबर सर्वच समाज शिवसेनेबरोबर येत असल्याचे शिंदे म्हणाले. शिवसेना जात, पात, धर्म मानणारा पक्ष नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे हे सर्वांना कळले असल्याने नवी मुंबईतील सर्व समाज शिवसेनेच्या बाजूने मुख्य प्रवाहामध्ये येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेची पंढरपूर येथील उद्धव ठाकरे यांची विक्र मी सभा झाली. राज्यातील सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम शिवसेना करत आहे. शिवसेना सत्तेत जरी असली, तरी जेव्हा जनतेचे प्रश्न येतात तेव्हा सत्ता, सरकार बाजूला ठेवून शिवसेना जनतेचे प्रश्न सोडविते. त्यामुळे शिवसेनेची नाळ सत्तेशी नाही तर जनतेशी जोडलेली असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदार संघासह ठाणे जिल्ह्यावरही निर्विवाद यश मिळविण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावे असावे, असे आवाहनही त्यांनी केले.निवडणुकीचे वर्ष आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागले पाहिजे, असे मत शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी व्यक्त केले. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये हिंदी भाषकांनी सहकार्य केले असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या माध्यमातून शहरात आठवड्याला किमान २० कार्यक्र म घेण्यात येत असून, सुदैवाने आमच्यातील मतभेद मिटलेले असल्याचे त्यांनी सांगितले. वेळ वाया घालविण्यापेक्षा काम केले तर येणारा काळ आपलाच असल्याचे नाहटा यांनी सांगितले. या वेळी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर उपस्थित होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९