शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांना ‘नो एंट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 02:51 IST

भूस्खलनामुळे ९ ऑगस्टपर्यंत बंदी; बंधाऱ्यात मातीचा ढीग; झाडे पडल्याने पायवाटेत अडथळे

पनवेल : अतिवृष्टीमुळे कर्नाळा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. अभयारण्यात विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने यामुळे कर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायवाटेसाठीही अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने शुक्रवार, ९ आॅगस्टपर्यंत पर्यटकांना कर्नाळा अभयारण्यात येण्यास मज्जाव केला आहे.पावसाळ्यात वर्षासहलीसाठी कर्नाळा अभयारण्याला पर्यटकांकडून नेहमीच पसंती दिली जाते. सुट्टीच्या दिवशी तर या ठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात. रायगड जिल्ह्यातील अनेक प्रमुख धबधब्यावर प्रवेश बंदी करण्यात आल्याने गेल्या काही दिवसांत पर्यटकांच्या संख्येत आणखीनच भर पडली आहे. मात्र, रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्नाळा अभयारण्यात भूस्खलन झाले असून मोठे नुकसान झाले आहे.येथील प्रसिद्ध मयूर बंधारा पूर्णपणे मातीने भरल्याने सर्व परिस्थितीत पूर्ववत करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ९ आॅगस्टपर्यंत या ठिकाणी पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पी. पी. चव्हाण यांनी दिली. कर्नाळा अभयारण्यात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीचा अहवाल चव्हाण यांनी उपवनसंरक्षक वन्यजीव ठाणे यांना दिल्यानंतर त्यांनी सर्व कामे सुरळीत करण्यासाठी ९ तारखेपर्यंत अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्याच्या घडीला किल्ल्यावर निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी साफसफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. विविध ठिकाणी उन्मळून पडलेली झाडे बाजूला करण्याचे कामही सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.