शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

एनएमएमटीचा प्रवास महागला

By admin | Updated: July 5, 2015 03:51 IST

एनएमएमटीचा तोटा भरून काढण्यासाठी तिकीट दर वाढविण्याचा निर्णय परिवहन उपक्रमाने घेतला आहे. ५ जुलैपासून साध्या बसेसच्या पहिल्या टप्प्यासाठी ५ ऐवजी

नवी मुंबई : एनएमएमटीचा तोटा भरून काढण्यासाठी तिकीट दर वाढविण्याचा निर्णय परिवहन उपक्रमाने घेतला आहे. ५ जुलैपासून साध्या बसेसच्या पहिल्या टप्प्यासाठी ५ ऐवजी ७ व वातानुकूलित बसेससाठी १५ ऐवजी २० रुपये दर आकारण्यात येणार असून पुढील टप्प्यांचे दरही त्याच प्रमाणात वाढणार आल्याने प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे.नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामध्ये ३६० बसेस आहेत. महापालिका क्षेत्रासह मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, खारघर, कळंबोली, पनवेल, उरण या भागांत ५१ व वातानुकूलित ६ अशा ५७ मार्गांवर बसेस धावत आहेत. उपक्रमाला प्रतिकिलोमीटर ३८.१५ रुपये एवढे उत्पन्न मिळत आहे. परंतु प्रतिकिलोमीटर ५४.१ रुपया खर्च होत आहे. प्रतिकिलोमीटर १५.८६ रुपये एवढा तोटा सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीमध्ये महिन्याला ३ कोटी रुपयांचा तोटा होत आहे. पालिकेने सप्टेंबर २०१२ मध्ये भाडेवाढ केली होती. तेव्हा डिझेलचे दर ४४.२९ रुपये व सीएनजीचे दर ३३.४१ रुपये एवढे होते. आता हेच दर अनुक्रमे ७२.४५ व ६०.२० रुपये एवढे झाले आहे. महापालिकेने यापूर्वीच दर वाढविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सर्वसाधारण सभेने विरोध केल्यामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. अखेर पुन्हा भाववाढीचा निर्णय घेतला.एनएमएमटीच्या साध्या बसेसला पहिल्या टप्प्यासाठी पूर्वी ५ रुपये तिकीट होते आता ७ रुपये आकारण्यात येणार आहे. वातानुकूलित बसला १५ रुपये तिकीट होते, आता २० रुपये मोजावे लागणार आहे. तोटा भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला असला तरी त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. (प्रतिनिधी)