शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

एनएमएमटीचा प्रवास महागला

By admin | Updated: July 5, 2015 03:51 IST

एनएमएमटीचा तोटा भरून काढण्यासाठी तिकीट दर वाढविण्याचा निर्णय परिवहन उपक्रमाने घेतला आहे. ५ जुलैपासून साध्या बसेसच्या पहिल्या टप्प्यासाठी ५ ऐवजी

नवी मुंबई : एनएमएमटीचा तोटा भरून काढण्यासाठी तिकीट दर वाढविण्याचा निर्णय परिवहन उपक्रमाने घेतला आहे. ५ जुलैपासून साध्या बसेसच्या पहिल्या टप्प्यासाठी ५ ऐवजी ७ व वातानुकूलित बसेससाठी १५ ऐवजी २० रुपये दर आकारण्यात येणार असून पुढील टप्प्यांचे दरही त्याच प्रमाणात वाढणार आल्याने प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे.नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामध्ये ३६० बसेस आहेत. महापालिका क्षेत्रासह मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, खारघर, कळंबोली, पनवेल, उरण या भागांत ५१ व वातानुकूलित ६ अशा ५७ मार्गांवर बसेस धावत आहेत. उपक्रमाला प्रतिकिलोमीटर ३८.१५ रुपये एवढे उत्पन्न मिळत आहे. परंतु प्रतिकिलोमीटर ५४.१ रुपया खर्च होत आहे. प्रतिकिलोमीटर १५.८६ रुपये एवढा तोटा सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीमध्ये महिन्याला ३ कोटी रुपयांचा तोटा होत आहे. पालिकेने सप्टेंबर २०१२ मध्ये भाडेवाढ केली होती. तेव्हा डिझेलचे दर ४४.२९ रुपये व सीएनजीचे दर ३३.४१ रुपये एवढे होते. आता हेच दर अनुक्रमे ७२.४५ व ६०.२० रुपये एवढे झाले आहे. महापालिकेने यापूर्वीच दर वाढविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सर्वसाधारण सभेने विरोध केल्यामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. अखेर पुन्हा भाववाढीचा निर्णय घेतला.एनएमएमटीच्या साध्या बसेसला पहिल्या टप्प्यासाठी पूर्वी ५ रुपये तिकीट होते आता ७ रुपये आकारण्यात येणार आहे. वातानुकूलित बसला १५ रुपये तिकीट होते, आता २० रुपये मोजावे लागणार आहे. तोटा भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला असला तरी त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. (प्रतिनिधी)