शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
5
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
6
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
7
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
8
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
9
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
12
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
13
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
14
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
15
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
16
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
17
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
18
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
19
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एनएमएमटी, उरण रेल्वेमार्गाच्या रुळाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:49 IST

नवी मुंबई : उरण रेल्वेमार्गाचे रूळ जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता नेरूळ ते पनवेल मार्गावरील रेल्वे वाहतूक सोमवार दुपारपर्यंत बंद करण्यात आली होती.

नवी मुंबई : उरण रेल्वेमार्गाचे रूळ जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता नेरूळ ते पनवेल मार्गावरील रेल्वे वाहतूक सोमवार दुपारपर्यंत बंद करण्यात आली होती. यामुळे रेल्वे प्रवाशांचे होणारे हाल टाळण्यासाठी सदर मार्गावर एनएमएमटीच्या ५० जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या.उरण रेल्वेमार्गातील सर्व अडथळे दूर झाल्याने अंतिम टप्प्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. नेरूळ व सीबीडी येथून उरण मार्गावर लोकल धावणार आहे. त्याकरिता सीवूड स्थानकादरम्यान काही ठिकाणी रूळ तोडून उरण मार्गाला जोडले जाणार आहेत. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या कामासाठी नेरूळ ते पनवेल मार्गावरील रेल्वेचा ब्लॉक घोषित करण्यात आला होता. त्यानुसार रविवार ते सोमवार दुपारपर्यंत २४ तासांकरिता ब्लॉक घोषित करून रूळ जोडणीचे काम सुरू होते. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत नेरूळ ते पनवेल मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू होणार होती. परंतु अपेक्षित वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे संध्याकाळपर्यंत रेल्वे वाहतुक सुरू झालेली नव्हती. परिणामी पनवेल व नेरूळ दरम्यान प्रवास करणाºया रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दोन्ही स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्यामध्ये चाकरमान्यांसह ख्रिसमसनिमित्ताने घराबाहेर पडलेल्यांचा अधिक समावेश होता. दरम्यान ब्लॉक घोषित झाला तेव्हाच रेल्वे प्रवाशांचे संभाव्य हाल लक्षात घेऊन एनएमएमटीने ज्यादा बस सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार सोमवारी सकाळी पाच वाजल्यापासून नेरूळ ते पनवेल मार्गावर ५० हून अधिक जादा बस सोडण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला. संध्याकाळी नेरूळ स्थानकाबाहेर प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यांना निश्चित स्थळी जाणाºया बसची माहिती देण्याकरिता एनएमएमटीचे कर्मचारी नेमण्यात आले होते. त्याशिवाय गर्दीमध्ये अनपेक्षित प्रकार घडू नये याकरिता स्थानकाच्या परिसरात पोलिसांचाही चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. परिवहन सभापती प्रदीप गवस व व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनीदेखील त्या ठिकाणी उपस्थित राहून आढावा घेतला.>रेल्वे बंद असल्याने पनवेल स्थानकात शुकशुकाट पसरला होता. नेहमी वर्दळ असलेल्या स्थानकाबाहेरील जागेत प्रवासी व रिक्षांची गर्दी कमी झाली होती. तर ज्या प्रवाशांना रेल्वे बंद असल्याचे माहीत नव्हते, त्यांना मात्र तासन्तास स्थानकात बसून रेल्वे सुरू होण्याची वाट पाहावी लागली.