शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एनएमएमटी, उरण रेल्वेमार्गाच्या रुळाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:49 IST

नवी मुंबई : उरण रेल्वेमार्गाचे रूळ जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता नेरूळ ते पनवेल मार्गावरील रेल्वे वाहतूक सोमवार दुपारपर्यंत बंद करण्यात आली होती.

नवी मुंबई : उरण रेल्वेमार्गाचे रूळ जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता नेरूळ ते पनवेल मार्गावरील रेल्वे वाहतूक सोमवार दुपारपर्यंत बंद करण्यात आली होती. यामुळे रेल्वे प्रवाशांचे होणारे हाल टाळण्यासाठी सदर मार्गावर एनएमएमटीच्या ५० जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या.उरण रेल्वेमार्गातील सर्व अडथळे दूर झाल्याने अंतिम टप्प्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. नेरूळ व सीबीडी येथून उरण मार्गावर लोकल धावणार आहे. त्याकरिता सीवूड स्थानकादरम्यान काही ठिकाणी रूळ तोडून उरण मार्गाला जोडले जाणार आहेत. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या कामासाठी नेरूळ ते पनवेल मार्गावरील रेल्वेचा ब्लॉक घोषित करण्यात आला होता. त्यानुसार रविवार ते सोमवार दुपारपर्यंत २४ तासांकरिता ब्लॉक घोषित करून रूळ जोडणीचे काम सुरू होते. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत नेरूळ ते पनवेल मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू होणार होती. परंतु अपेक्षित वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे संध्याकाळपर्यंत रेल्वे वाहतुक सुरू झालेली नव्हती. परिणामी पनवेल व नेरूळ दरम्यान प्रवास करणाºया रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दोन्ही स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्यामध्ये चाकरमान्यांसह ख्रिसमसनिमित्ताने घराबाहेर पडलेल्यांचा अधिक समावेश होता. दरम्यान ब्लॉक घोषित झाला तेव्हाच रेल्वे प्रवाशांचे संभाव्य हाल लक्षात घेऊन एनएमएमटीने ज्यादा बस सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार सोमवारी सकाळी पाच वाजल्यापासून नेरूळ ते पनवेल मार्गावर ५० हून अधिक जादा बस सोडण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला. संध्याकाळी नेरूळ स्थानकाबाहेर प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यांना निश्चित स्थळी जाणाºया बसची माहिती देण्याकरिता एनएमएमटीचे कर्मचारी नेमण्यात आले होते. त्याशिवाय गर्दीमध्ये अनपेक्षित प्रकार घडू नये याकरिता स्थानकाच्या परिसरात पोलिसांचाही चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. परिवहन सभापती प्रदीप गवस व व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनीदेखील त्या ठिकाणी उपस्थित राहून आढावा घेतला.>रेल्वे बंद असल्याने पनवेल स्थानकात शुकशुकाट पसरला होता. नेहमी वर्दळ असलेल्या स्थानकाबाहेरील जागेत प्रवासी व रिक्षांची गर्दी कमी झाली होती. तर ज्या प्रवाशांना रेल्वे बंद असल्याचे माहीत नव्हते, त्यांना मात्र तासन्तास स्थानकात बसून रेल्वे सुरू होण्याची वाट पाहावी लागली.