शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

एनएमएमटीला प्रतिमहिना तीन कोटी तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 03:39 IST

महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. डिझेलच्या दरामध्ये होत असलेली वाढ, अवैध प्रवासी वाहतूक व खड्ड्यांमुळे उपक्रमाला मोठा फटका बसत असून प्रत्येक महिन्याला जवळपास तीन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई -  महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. डिझेलच्या दरामध्ये होत असलेली वाढ, अवैध प्रवासी वाहतूक व खड्ड्यांमुळे उपक्रमाला मोठा फटका बसत असून प्रत्येक महिन्याला जवळपास तीन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई परिवहन उपक्र म सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई शहरासह, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, पनवेल, उरण आदी भागात एनएमएमटीचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. प्रवाशांसाठी सुविधा देणारा नवी मुंबई परिवहन उपक्र म गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यातच आहे. पालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे हे नवी मुंबईत येण्यापूर्वी या बस सुमारे प्रति किलोमीटर ४३ रु पये तोट्यात होत्या. परिवहन उपक्र मात मुंढे यांनी आयटीएस प्रणाली, ई तिकिटिंग, सतत गैरहजार राहणाऱ्या कर्मचाºयांवर कारवाई, तोट्यात असणारे बस मार्ग बंद करणे असे विविध बदल केल्यामुळे या बस १८ रु पये तोट्यापर्यंत पोहचल्या होत्या. त्यानंतर हेच तोट्याचे प्रमाण कमी होऊन प्रत्येक किलोमीटरमागे सुमारे १२ रु पयांपर्यंत आले होते. गेल्या सहा महिन्यापासून डिझेलच्या दरात लिटरमागे सुमारे २0 रु पये वाढले आहेत. एनएमएमटी बस चालविण्यासाठी दर दिवसाला २५ हजार लिटर डिझेलची गरज लागते. डिझेलचे दर वाढल्याने दिवसाला ५ लाख रु पये तर महिन्याला दीड कोटी रु पये डिझेलसाठी अतिरिक्त खर्च वाढला आहे. परिवहन सेवेत आस्थापनेवर काम करणाºया कर्मचाºयांना ३ टक्के तर ठोक मानधन, रोजंदारी पद्धतीने काम करणाºया कर्मचाºयांना देखील काही प्रमाणावर दरवर्षी जुलै महिन्यात वेतनवाढ देण्यात आली.वेतनवाढ झाल्याने हा खर्च सुमारे ५0 लाख रु पयांनी वाढला आहे. शाळा सुरू झाल्यावर दरवर्षी जून महिन्यात एनएमएमटीच्या उत्पन्नात ५ ते ७ टक्क्यांनी वाढ होते. म्हणजेच दरवर्षी सुमारे ७0 लाख रु पयांनी उत्पन्न वाढते.नवी मुंबईमधून कल्याण, उरण, मुंबईकडे खाजगी वाहनांमधून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्याचा मोठा फटका एनएमएमटीला बसत आहे. खड्ड्यांमुळे बसेस वेळेत पोहचत नाहीत. यामुळे अनेक फेºया रद्द कराव्या लागत आहेत. यामुळे पावसाळ्यापुर्वीपेक्षा ५0 लाख उत्पन्न कमी होत आहे. महिन्याला एक कोटी वीस लाख रु पयांचा तोटा होत आहे. एकूण दरमहिन्याला सुमारे ३ कोटी रु पयांचा तोटा नवी मुंबई परिवहन सेवेला होत आहे. परिवहन सेवेला जून महिन्याआधी होणाºया तोट्याच्या तुलनेत सध्या होणारा आर्थिक तोटा दुप्पट झाला आहे.सहा महिन्यापासून डिझेलचे दर लिटरमागे सुमारे २0 रु पयांपर्यंत वाढले आहेत. त्याचबरोबर अवैध वाहतूक, वाढलेल्या रिक्षा, खड्ड्यांमुळे बसचे होणारे नुकसान यामुळे जून महिन्यापासून तोट्यात वाढ झाली आहे.- शिरीष आरदवाड,परिवहन व्यवस्थापकनवी मुंबई मनपा क्षेत्राबाहेरील मार्गपनवेल महापालिका क्षेत्रात एनएमएमटीचे २६ मार्ग सुरू असून विविध मार्गांवर १२३ बस धावतातउरण नगरपरिषद क्षेत्रात एनएमएमटीचे ३ मार्ग सुरू असून विविध मार्गांवर ४0 बस धावतातबदलापूर नगरपरिषद क्षेत्रात एनएमएमटीचा १ मार्ग सुरू असून या मार्गावर ५ बस धावतातखड्ड्यांमधील मार्गसायन-पनवेल महामार्गावर कळंबोली, कोपरा, खारघर, सीबीडी, उरण फाटा, शिरवणे फाटा, तुर्भे नाका, सानपाडा, वाशी गाव.डोंबिवली, शिळफाटाबामन डोंगरी, किल्ले गावठाण, वहाळ, तरघर, उरण, गव्हाण फाटा, द्रोणागिरीमुंब्रा बायपासचे काम सुरू असल्याने ऐरोली टोलनाका, दिवा सर्कल, रबाळेठाणे, कळवा, कल्याण पत्री पूलपनवेल भागातील करंजाडे, नेरे, पनवेल शहर, तळोजामुंबई भागातील पश्चिम उपनगरात अंधेरी ते बोरीवली दरम्यान मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्त्याची रु ंदी कमी करण्यात आल्याने होणारी वाहतूककोंडीएकूण बस ४५२मार्ग७0सीएनजी बस ११0डिझेल बस ३४२

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाnewsबातम्या