शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

वायपरअभावी एनएमएमटीच्या बस आगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 03:13 IST

पावसाळा सुरू होऊनही एनएमएमटीच्या गाड्यांना वायपर नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात वायपरअभावी अनेक बस अर्ध्या प्रवासातून आगारात न्याव्या लागल्या.

नवी मुंबई : पावसाळा सुरू होऊनही एनएमएमटीच्या गाड्यांना वायपर नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात वायपरअभावी अनेक बस अर्ध्या प्रवासातून आगारात न्याव्या लागल्या. या प्रकारावरून एनएमएमटीच्या अभियांत्रिकी विभागाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त होत आहे.सोमवारी रात्रीच्या सुमारास शहरात जोराच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. या दरम्यान रेल्वेचाही खोळंबा झाल्याने शहरातील प्रवाशांना निश्चित ठिकाणी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी बेस्ट व एनएमएमटी प्रशासनावर आली होती. नेमक्या त्याच वेळी एनएमएमटीच्या बस आगारात जमा करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. केवळ वायपर नसल्याने विविध मार्गांवरील २८ बस अर्ध्या मार्गातून परत आगारात आल्या. याचा फटका परिवहनच्या नियमित प्रवाशांना बसला आहे. पावसाळा सुरू झाल्याची चाहूल काही दिवसांपूर्वीच लागलेली असतानाही एनएमएमटीच्या बहुतांश गाड्यांवर वायपर बसवण्यात आलेले नाहीत. यामुळे सोमवारी रात्री मुसळधार पाऊस पडताच, चालकांना रस्त्यावरील परिस्थिती पाहण्यास अडथळा निर्माण झाला होता. वायपर नसल्याने बस चालवताना काचेवरून वाहणारे पाणी हटवायचे कसे? असा प्रश्न त्यांना पडला होता. तर रात्रीच्या काळोखात वायपरअभावी रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचीही शक्यता होती. त्यामुळे या बस प्रवासाचा टप्पा पूर्ण न करता, प्रवाशांना अर्धवट मार्गात सोडावे लागले.वायपर नसलेल्या बसएम.एच. ४३. बीजी. २४५५, एम.एच. ४३. बीजी.२४५६, एम.एच. ४३. एच. ५४७१, एम.एच. ४३. एच. ५४६४, एम.एच. ४३. एच. ५४६७, एम.एच. ४३. एच. ५४६१, एम.एच. ४३. एच. ५४१९, एम.एच. ४३. एच. ५४५० व इतर.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई