शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

मनपा प्रशासनाचा रुग्णांच्या जीवाशी खेळ

By admin | Updated: November 17, 2016 06:28 IST

महानगरपालिका नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळत आहे. पालिकेच्या अतिदक्षता विभागातील व्हेंटीलेटर बंद आहेत.

नामदेव मोरे

नवी मुंबई : महानगरपालिका नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळत आहे. पालिकेच्या अतिदक्षता विभागातील व्हेंटीलेटर बंद आहेत. एनआयसीयू विभाग पूर्णपणे बंद झालेला आहे. स्वत: उपचार देण्यास अपयश आले असून स्वस्तात उपचार देणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयावर आकसाने कारवाई केली जात असल्याबद्दल नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कारवाईमुळे शहरवासीयांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभाराचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उमटले. शहरवासीयांना चांगली आरोग्य सुविधा पुरविण्यामध्ये प्रशासनास पूर्णपणे अपयश आले आहे. सभापती शिवराम पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका. पालिकेची रुग्णालये बंद पडली आहेत. रुग्णांना उपचार देता येत नाहीत. प्रथम संदर्भ रुग्णालयामधील अतिदक्षता विभागातील १० पैकी ५ व्हेंटीलेटर बंद पडले आहेत. सहा महिन्यांपासून लहान मुलांचा अतिदक्षता विभाग पूर्णपणे बंद आहे. नवजात शिशूला अतिदक्षता विभागात ठेवण्यासाठीही सुविधाच नसल्याने नाइलाजाने खाजगी रुग्णालयामध्ये जादा पैसे देवून भरती करावे लागत आहे. खाजगी रुग्णालयांमधील उपचार परवडत नसल्याने गरीब रुग्णांसाठी नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय हा एकमेव आधार उरला आहे. त्या रुग्णालयावर कारवाई करून अप्रत्यक्षपणे गरीब रुग्णांनाच वेठीस धरले जात असल्याची टीकाही सभापतींनी केली. महापालिकेचे सभागृहनेते जे. डी. सुतार यांनीही अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. अक्षरश: रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. रुग्णालयामध्ये पुरेशी यंत्रणाच उपलब्ध नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. शुभांगी पाटील यांच्यासह इतर नगरसेवकांनीही पालिकेच्या कारवाईविषयी नाराजी व्यक्त केली. मनपा रुग्णालयामधील एक्सरे, कलर डॉप्लर, रूटीन सोनोग्राफीसाठीच्या ३३ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरीचा विषय स्थायी समितीमध्ये मांडण्यात आला होता. याशिवाय राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोलीमधील तपासण्यासाठी ३३ लाख व मेडिकल गॅस पुरविण्यासाठीच्या २५ लाख रुपयांच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली. आम्ही आरोग्याच्या खर्चाविषयी कधीच कंजुषी करत नाही, पण प्रशासनाने रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवाव्या, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. न्यायालयाने यापूर्वी फटकारले होते महापालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी हिरानंदानी फोर्टीजसह अनेक हॉस्पिटलची नोंदणी रद्द केली होती. या कारवाईविरोधात फोर्टीज व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले होते. रूग्णांच्या आयुष्याशी खेळू नका, असे सुनावले होते. यामुळे या वेळी रूग्णालयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे; पण रूग्णालय बंद करण्याचे आदेश दिलेले नाहीत. न्यायालयात या निर्णयाचे बुमरँग होऊ नये व नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागू नये, यासाठी असे केल्याचे पालिकेत बोलले जात आहे. गरीब रूग्णांनी जायचे कुठे?महापालिकेने नेरूळमधील डी. वाय. पाटील रूग्णालयात रूग्णांनी जाऊ नये, असे प्रसिद्धीपत्रक काढले आहे. या निर्णयामुळे शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे. सद्यस्थितीमध्ये मोफत व सवलतीच्या दरात उपचारासाठी नवी मुंबईमध्ये डॉ. डी. वाय. पाटील हे एकमेव रूग्णालय आहे. इतर कोणत्याही खासगी व महापालिकेच्या रूग्णालयामध्ये गरीब रूग्णांना उपचार घेता येत नाहीत. महापालिकेने डी. वाय. पाटीलमध्ये जाऊ नका असे फर्मान काढले आहे; पण मग गरिबांनी जायचे कुठे असा प्रश्न रूग्ण व लोकप्रतिनिधीही विचारू लागले आहेत. हृदयविकार झालेल्या मुलांना आधार डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयाने मुख्यमंत्री साहाय्यता निधीलाही मदतीचा हात दिला. राज्यातील ग्रामीण भागातील हृदयविकाराने त्रस्त असलेल्या ६५ पेक्षा जास्त मुलांवर पूर्णपणे मोफत औषध उपचार या रूग्णालयामध्ये करण्यात आले आहेत. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेरूळमध्ये येऊन या कार्याचे कौतुक केले होते.