शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

जिल्ह्यात निर्मळ सागर तट अभियान

By admin | Updated: September 17, 2016 02:14 IST

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील सहा समुद्र किनाऱ्यांसहित महाराष्ट्रातील ६५ समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता केली जाणार

बोर्ली-मांडला/ मुरुड : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील सहा समुद्र किनाऱ्यांसहित महाराष्ट्रातील ६५ समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता केली जाणार असून या अभियानाचा शुभारंभ शनिवारी १७ सप्टेंबर रोजी वर्सोवा येथे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.१७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१६ पर्यंत निर्मळ सागर पंधरवडा साजरा करण्यात येत असून यामध्ये सर्वोत्कृष्ट किनारपट्टीला रु पये २५ लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. निर्मळ सागर अभियानात रायगड जिल्ह्यातील अलिबाग, काशिद, मुरु ड, श्रीवर्धन, रेवदंडा, दिवेआगर आदी सहा समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे. या अभियानात समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षण, संवर्धन व्यवस्थापन, किनारपट्टी संरक्षणाबाबत जनजागृती, जलक्र ीडा व्यवस्थापन, पर्यटनास प्रोत्साहन देणे व वृद्धिंगत करणे, पर्यावरण संवर्धक म्हणून बायोगॅस, सौर, वायू ऊर्जा या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन देणे, किनाऱ्यावर सतर्कता राखून जीवरक्षकांमार्फत बुडण्याचे प्रसंग टाळणे, कोणी बुडाल्यास बचाव आणि मदतकार्य कारणे आदी प्रकारची प्रात्यक्षिके होणार आहेत. समुद्र किनारा स्वच्छ व सुंदर ठेवून पर्यटनवाढीस चालना देण्याचे प्रयत्न या अभियानामार्फत करण्यात येणार आहे. (वार्ताहर)