शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

आरोपांची पडताळणी एनआयएन करणार

By admin | Updated: February 3, 2016 03:42 IST

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट केसमधील आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत आरोप ठेवला जाऊ शकतो का? याची पडताळणी राष्ट्रीय तपास पथक (एनआयए) करत असल्याची माहिती खुद्द एनआयएने मंगळवारी विशेष

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोट केसमधील आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत आरोप ठेवला जाऊ शकतो का? याची पडताळणी राष्ट्रीय तपास पथक (एनआयए) करत असल्याची माहिती खुद्द एनआयएने मंगळवारी विशेष मोक्का न्यायालयाला दिली. त्यामुळे विशेष न्यायालयाने या केसवरील सुनावणी १५ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे.२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावातील अत्यंत संवेदनशील परसिरात मोटरसायकलमध्ये बॉम्ब ठेवून बॉम्बस्फोट घडवण्यात आला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर १०१ जखमी झाले. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) यासंबंधी ११ जणांना अटक केली. त्यात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित व अन्य नऊ जणांचा समावेश आहे. जानेवारी २००९ मध्ये एटीएसने सर्व आरोपींवर मोक्कांतर्गत आरोपपत्र दाखल केले. मात्र २०११ मध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या दहशतवादी कृत्याच्या सर्व केसेस एनआयएकडे वर्ग करण्यात आल्या. या केसवर देखरेख करणाऱ्या कायदेतज्ज्ञांना व तपासधिकाऱ्यांना ही केस मोक्कांतर्गत कशी नोंदवण्यात आली? असा प्रश्न पडला आहे. त्यांना यावर आक्षेप आहे.त्यांनी हा मुद्दा अ‍ॅटर्नी जनरल यांच्यापुढे मांडला असून ते लवकरच याबाबत त्यांचे मत स्पष्ट करतील, अशी माहिती एनआयचे वकील अविनाश रसाळ यांनी विशेष मोक्का न्यायालयाला दिली. विशेष सरकारी वकील रोहिणी सॅलियन यांनी केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)