शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नवीन पनवेलला पुराचा धोका, सिडकोची मूळ आराखड्याला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 01:43 IST

विकासकांचे हित डोळ्यासमोर ठेवून सिडकोने विक्री केलेल्या भूखंडांना नव्याने रस्ता देण्यासाठी मोठ्या नाल्यावर अतिक्रमण करण्याचा घाट घालून मूळ आराखड्याला बगल दिली आहे.

पनवेल : विकासकांचे हित डोळ्यासमोर ठेवून सिडकोने विक्री केलेल्या भूखंडांना नव्याने रस्ता देण्यासाठी मोठ्या नाल्यावर अतिक्रमण करण्याचा घाट घालून मूळ आराखड्याला बगल दिली आहे. त्यामुळे नवीन पनवेलला पुराचा धोका वाढला आहे. त्यामुळे सिडकोचा हा निर्णय येथील रहिवाशांच्या हिताचा नसून यासंदर्भात सिडकोने नव्याने फेरनिविदा काढण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी राज्याचे प्रधान सचिव नितीन करीर यांना लिहिलेल्या पत्रात यासंदर्भात फेरनिविदा काढण्याची मागणी केली आहे, जेणेकरून सिडकोला त्याचा अधिक फायदा होईल.वास्तविक गेल्या काही वर्षांपासून नवीन पनवेल, खांदा कॉलनी सेक्टर १-ई मधील सिडकोच्या भूखंडांवर साडेतीन हजाराहून अधिक झोपड्या बांधल्या होत्या. त्यात सिडको अधिकाºयांसह विविध राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले होते. त्यातून चालणारे गैरधंदे शहराच्या सामाजिक जीवनाच्या मुळावर घाव घालत असल्याने संघर्ष समितीने त्या झोपड्या सिडकोच्या अतिक्र मण विभागाकडून उद्ध्वस्त करून घेतल्या. त्यानंतर सिडकोने ते भूखंड जवळपास ४३५ कोटी रुपयांत निविदा काढून विकले.सिडकोच्या १४0, १४0 अ, आणि १४0 ब क्र मांकाच्या भूखंडांची विक्र ी निविदेद्वारे केलेली आहे. सदर भूखंडाना मूळ नियोजन आराखड्यात खांदा कॉलनीच्या बाजूने (पाठीमागील बाजूने) रस्ता देण्यात आला होता. आता विकासकांचा आर्थिक फायदा व्हावा म्हणून सिडकोने त्या मूळ आराखड्यात बदल करून समोरच्या बाजूने (नवीन पनवेलच्या दिशेने) चक्क मुख्य नाल्यावर भराव करून रस्ता देण्याचा घाट घातला आहे. तो पूर्णत: बेकायदेशीर आणि नवीन पनवेल शहराच्या दृष्टीने अतिशय धोकादायक ठरणारा आहे.करीर यांना पाठविलेल्या पत्रात कडू यांनी सिडको अधिकाºयांच्या बिल्डरधार्जिण्या धोरणावर कडाडून हल्ला केला आहे. जर पुढील बाजूने रस्ता त्या भूखंडांना आधीच दिला असता, तर त्या तीनही भूखंडांपोटी सिडकोला किमान दोनशे कोटी रुपयांचा अधिक फायदा झाला असता, शिवाय पंचतारांकित हॉटेलसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाची विक्र ीही चढ्या भावाने झाली असती. रस्ता मागील बाजूने असल्यामुळे त्या भूखंडाची विक्र ी होऊ शकलेली नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.पनवेल संघर्ष समितीने केलेल्या उठावामुळे सिडकोला जागे करत अतिक्र मण केलेल्या साडेतीन हजार झोपड्या पाडण्यास प्रवृत्त केल्याने ४३५ कोटी रुपयांची तिजोरीत भर पडली. आता सुचविलेल्या मार्गानुसार नगरविकास खाते आणि सिडकोने फेरविचार केल्यास दोनशे कोटींचा फायदा होईल. तसे न केल्यास संघर्ष समिती सिडको आणि नगरविकास खात्याला न्यायालयात खेचून ती रक्कम न्यायालयात जमा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याची माहितीही करीर यांना दिली आहे. त्या अर्जाच्या प्रती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, सिडकोचे दक्षता विभागाचे प्रमुख विनय कारगांवकर, पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना पाठविल्या आहेत. तसेच एक प्रत माहितीसाठी उच्च न्यायालयाच्या अधीक्षकांना देण्यात आली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल