शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उत्सवात जुगार बंदीचा नवी मुंबई पॅटर्न

By admin | Updated: September 29, 2015 00:52 IST

समाजप्रबोधनाच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. परंतु गत काही वर्षांमध्ये गणेश मंडळांमध्ये रात्रभर जुगाराचा अड्डा सुरू होवू लागला होता.

नामदेव मोरे, नवी मुंबई समाजप्रबोधनाच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. परंतु गत काही वर्षांमध्ये गणेश मंडळांमध्ये रात्रभर जुगाराचा अड्डा सुरू होवू लागला होता. पोलिसांनी प्रथमच मंडळातील जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. यामुळे महापालिका क्षेत्रामध्ये यावर्षी जुगारविरहित उत्सव साजरा झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. लोकमान्य टिळकांनी समाजामध्ये देशप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. १२२ वर्षांच्या वाटचालीमध्ये हा उत्सव जगभर पोहचला. उत्सवाचे स्वरूप बदलू लागले. प्रत्येक मंडळ लाखो रुपयांचा खर्च करू लागले. समाजप्रबोधनाचे देखावे दाखविले जात असले तरी रात्रभर गणरायासमोरच जुगाराचे अड्डे सुरू झाले. नवी मुंबईमधीलही बहुतांश मंडळांमध्ये रात्री जुगार खेळला जात होता. दिवसा जे मंडपामध्ये फिरकतही नाहीत ते रात्रभर जुगार खेळण्यासाठी मात्र उपस्थित राहू लागले. अनेक जण लाखो रुपये जुगारात गमावू लागले. अनेकांनी महिन्याचा पगार, सणासाठीची रक्कम जुगारात हरल्याची उदाहरणे आहेत. कोपरखैरणेमध्ये एका माथाडी कामगाराने यापूर्वी भाच्याच्या लग्नासाठी दागिने बनविण्यासाठी बहिणीने दिलेले पैसे जुगारात घालविले होते. खुलेआम सुरू असणाऱ्या या जुगाराकडे पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करू लागल्यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली होती. गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांविषयी सामान्य नागरिकांमध्ये नाराजी वाढू लागली होती. नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे उपआयुक्त शहाजी उमाप, गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी गणेशोत्सवामध्ये जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.यापूर्वी वर्षभर शहरातील बहुतांश सर्व जुगार अड्डे बंद केल्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांना या अधिकाऱ्यांची भीती वाटू लागली आहे. जुगार अड्डे बंद असल्यामुळे अनेकांनी गणेशोत्सव मंडळांचा आसरा घेण्यास सुरवात केली होती. पोलिसांचा आदेश डावलून काही ठिकाणी जुगार खेळला जात होता. पोलिसांनी विशेष पथक तयार करून धडक कारवाई सुरू केली. दहा दिवसांमध्ये ६ मंडळांवर कारवाई करून तब्बल ७२ जणांवर गुन्हे दाखल केले असून साडेपाच लाख रुपये रोकड व साहित्य जप्त केले आहे. पोलीस आयुक्तालयाची स्थापना १९९४ मध्ये झाली. यानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सवामध्ये जुगार अड्ड्यांवर कारवाई झाली. या कारवाईचे सामान्य नागरिकांनी स्वागत केले असून यामुळे उत्सवाला लागणारे गालबोट थांबणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. ----कारवाईचे स्वागत नवी मुंबई पोलिसांनी शहरातील सर्व जुगार अड्डे बंद केले आहेत. एखाद्या ठिकाणी जुगार सुरू असल्याविषयी सामान्य नागरिकाने तक्रार केली तरी तत्काळ कारवाई केली जात आहे. गणेश मंडळांमधीलही जुगार अड्ड्यांवर कारवाई केल्यामुळे बहुतांश सर्व मंडळांमधील कार्यकर्त्यांनी कारवाईच्या भीतीने जुगार खेळणे थांबविले. पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या या कारवाईचे शहरातील सामान्य नागरिकांनी विशेषत: महिलांनी स्वागत केले असून भविष्यातही जुगारबंदी कायम राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ---जुगाऱ्यांना खास आमंत्रणगणेशोत्सवामध्ये रात्री जागरण करता यावे यासाठी टाईमपास म्हणून पत्ते खेळले असल्याचा दावा काही मंडळे करत आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी ठरवून जुगार अड्डे चालविले जातात. त्यासाठी खास जुगार खेळणाऱ्यांना बोलावले जाते. जुगार खेळण्यासाठी पैसे घेतले जातात. लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. -------तुर्भे शिवाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गणेशोत्सव मंडळावर २१ सप्टेंबरला धाड टाकली. १ लाख ९३ हजार ६६० रुपये जप्त करून २७ जणांना अटक करण्यात आली. सेक्टर १६ मधील मिनी मार्केट येथील फे्रंड्स ग्रुप गणेशोत्सव मंडळावरही २१ सप्टेंबरला छापा टाकला. २८,९५० रुपये जप्त करून १७ जणांना अटक केली. २४ सप्टेंबरला पोलिसांनी कलश उद्यानाजवळील जुगार अड्ड्यावर धाड टाकून १ लाख ७ हजार ५३० रुपये जप्त करून ५ जणांना अटक केली. याच परिसरातील एका घराच्या बाजूला सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून १९,६०० रुपये जप्त केले व ८ जणांना अटक केली.