शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

नेरुळ येथील महापालिकेची भाजी मंडई ओस; प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:12 IST

फेरीवाले पदपथावर; नागरिकांची होतेय गैरसोय

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ सेक्टर १८ येथील भाजी मंडईमध्ये ओटले वाटप झालेले व्यावसायिक मंडईमध्ये व्यवसाय करीत नसून पदपथावरच व्यवसाय करीत आहेत. महापालिकेने लाखो रुपये खर्च केलेल्या मंडईचा वापर साहित्य ठेवण्यासाठी केला जात असून याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच यामुळे पदपथावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.शहरातील नागरिकांना मार्केटची सोय व्हावी आणि पदपथावर व्यवसाय करणारे लहान व्यावसायिकांना व्यवसायासाठी आपल्या हक्काची जागा मिळावी यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून मार्केटच्या प्रशस्त इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. परंतु या इमारतींमधील ओटल्यांचा वापर होत नसल्याने शहरातील अनेक मंडई ओस पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नेरु ळ सेक्टर १८ मधील भूखंड क्र मांक १५ वर २४ ओटल्यांची भाजी मंडई सुरू करण्यात आली होती. या भाजी मंडईतील ओटल्यांचे वाटप देखील करण्यात आले होते, परंतु काही फेरीवाले पदपथावर व्यवसाय करीत असल्याने नागरिक खरेदीसाठी मार्केटमध्ये येत नसल्याचे सांगत मार्केटच्या इमारतीमध्ये ओटले मिळालेले सर्वच फेरीवाले पुन्हा पदपथावर व्यवसाय करू लागले आहेत. त्यामुळे मंडईची इमारत धूळखात पडली असून या मंडईमध्ये जागा मिळालेले व्यावसायिक पदपथावर व्यवसाय करून रात्री साहित्य ठेवण्यासाठी या मंडईमधील जागेचा वापर करीत आहेत. व्यवसायासाठी फेरीवाल्यांनी पदपथ काबीज केल्याने ये-जा करणाºया पादचाऱ्यांना देखील विविध समस्यांचा सामना करावा लागतो.