शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळ-भाऊचा धक्का जलप्रवासाला मे महिन्याचा मुहूर्त?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 00:03 IST

नवी मुंबई ते मुंबई दरम्यानच्या सागरी मार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई ते मुंबई दरम्यानच्या सागरी मार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे. सध्या नेरुळ येथे उभारण्यात येत असलेल्या जेट्टीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत नेरुळ ते भाऊचा धक्का या दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार मे २०२० पासून या मार्गावर प्रत्यक्ष जलवाहतूक सेवा सुरू करण्याची योजना सिडकोने बनविली आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या टप्प्यात वर्षाला २० दशलक्ष प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात ही संख्या वर्षाला ६० दशलक्ष इतकी गृहित धरण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी जलद दळणवळणाची साधने आवश्यक असणार आहेत, त्यानुसार सिडको व राज्य शासन दळणवळणाच्या विविध पर्यायांवर विचार करत आहे. त्यामध्ये न्हावा-शेवा सी लिंक, कोस्टल रोड, सीएसएमटी-पनवेल रेल्वे उन्नत मार्ग आदीचा समावेश आहे. त्याचबरोबर मुंबईतून प्रवाशांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जलदगतीने पोहोचता यावे, या दृष्टीने जलमार्गाचा पर्याय निवडण्यात आला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी काही महिन्यांपूर्वी बीपीटीचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्यासोबत बैठक घेऊन या संदर्भात चर्चा केली होती. बीपीटी, जेएनपीटी आणि मेरीटाइम बोर्ड यांच्या संयुक्त सहकार्याने नवी मुंबई ते मुंबई दरम्यानचा सागरी मार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यानुसार मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून वाशी, बेलापूर आणि नेरुळ येथे जेट्टी उभारण्याचे काम सुरू आहे. यातील नेरुळ जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी सुमारे तीन हेक्टर जागेवर जलवाहतूक टर्मिनल विकसित करण्यात येत आहे. यात पाइल्ड प्लॅटफॉर्मवर टर्मिनलला जोडणारा रस्ता, टर्मिनलची इमारत, पार्किंग सुविधा, नेव्हिगेशनल आणि मार्शलिंग क्षेत्राचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी सिडकोने १११ कोटी रुपयांची तरतूद केली असून, एप्रिल २०२० पर्यंत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज सिडकोने व्यक्त केला आहे. त्यानंतर मे २०२० पासून नेरुळ ते भाऊचा धक्का दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्याची योजना असल्याचे सिडकोने आले आहे.>रस्ते वाहतुकीपेक्षा प्रस्तावित जलमार्ग अधिक सुकर व गतिमान असणार आहे. या जलमार्गामुळे मुंबई व नवी मुंबईतील प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. सुरू करण्यात येणाऱ्या कॅटामरान सेवेमुळे नेरुळ ते भाऊचा धक्का हे अंतर अवघ्या ३० मिनिटांत पार करता येणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर हा जलमार्ग अत्यंत उपयुक्त ठरणारा असल्याचा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.नवी मुंबई ते मुंबई दरम्यान जलमार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोसह बीपीटी, जेएनपेटी व मेरीटाइम बोर्डाच्या संयुक्त प्रयत्नातून नवी मुंबई ते मुंबई दरम्यान, जलमार्ग सुरू करण्याची योजना आहे.सध्या नेरुळ येथील जेट्टीचे काम प्रगतिपथावर आहे. एप्रिल २०२० पर्यंत जेट्टीचे काम पूर्ण करून मे २०२० पर्यंत प्रत्यक्ष जलवाहतूक सेवा सुरू करण्याची योजना असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले आहे.