शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

कोरोनाविषयी निष्काळजीपणा ठरतोय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 01:26 IST

४९ टक्के रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवास; वेळेत उपचार न घेतल्यामुळे धोका 

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोना चाचणीविषयी गैरसमज व दिरंगाई रुग्णांसाठी प्राणघातक ठरत आहे. वेळेत उपचार न घेतल्यामुळे अनेकांची प्रकृती चिंताजनक होत असून, त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागत आहे. सद्यस्थितीमध्ये रुग्णालयात उपचार घेणारे ४९ टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आयसीयू व व्हेंटिलेटर्सची संख्या कमी पडू लागली आहे. कोरोनाची लक्षणे दिसली की, तत्काळ चाचणी केली व उपचार सुरु केल्यास मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो.             

नवी मुंबईमध्येही कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली आहे. रुग्णालयांमधील जागा अपुरी पडू लागली आहे. प्रतिदिन ५ ते ९ जणांचा मृत्यू होत आहे. सर्वच वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे. रुग्णालयात ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर्सची संख्या कमी पडू लागली आहे. सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये वेटिंग लिस्ट लावण्यात आली आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ९६२४ असून, त्यापैकी ४५८१ रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपैकी तब्बल ४९ टक्के रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागत आहे. प्रतिदिन ५२ टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजन मिळविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी टास्क फोर्स तयार करावा लागला आहे. आयसीयू व व्हेंटिलेटर्सची मागणी वाढू लागली आहे. सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. रुग्णांना जागा मिळविताना नातेवाईक, राजकीय कार्यकर्ते व आरोग्य विभाग सर्वांचीच दमछाक हाेत आहे.

ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे तरुणांनाही ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासत आहे. कोरोनाविषयी गैरसमजामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे.  लक्षणे दिसू लागल्यानंतर व रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतरही अनेकजण चाचणी करुन घेत नाहीत. चाचणी केली की, अहवाल पॉझिटीव्हच येतो, असा लोकांनी गैरसमज घेतला जात आहे. लक्षणे दिसल्यानंतर चाचणी करण्याऐवजी फॅमिली डॉक्टरकडून औषधे घेऊन तीन - चार दिवस फुकट घालवले जात आहेत. 

चाचणी पॉझिटिव्हच येते हा गैरसमजकोरोनाची चाचणी केली की, अहवाल पॉझिटीव्हच येतो, हा गैरसमज आहे. नवी मुंबईमध्ये ८ लाख ६२ हजार ६०३ नागरिकांच्या चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी फक्त ८८,०३४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तब्बल ७ लाख ७४ हजार ५५९ चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. फक्त १० टक्के अहवाल पॉझिटिव्ह असून, ९० टक्के निगेटिव्ह आहेत. यामुळे कोणताही गैरसमज करून न घेता लक्षणे दिसली की, चाचणी करणे महत्त्वाचे आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये नागरिकांचे सक्रिय योगदान महत्त्वाचे आहे. कोरोनाची लक्षणे दिसली की, तत्काळ चाचणी करून घेणे आवश्यक आहे. वेळेत उपचार सुरु झाल्यास प्रकृती चिंताजनक होण्याचा व मृत्यू होण्याचा धोका कमी होतो.- अभिजीत बांगर, आयुक्त

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या