शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

कोरोनाविषयी निष्काळजीपणा ठरतोय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 01:26 IST

४९ टक्के रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवास; वेळेत उपचार न घेतल्यामुळे धोका 

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोना चाचणीविषयी गैरसमज व दिरंगाई रुग्णांसाठी प्राणघातक ठरत आहे. वेळेत उपचार न घेतल्यामुळे अनेकांची प्रकृती चिंताजनक होत असून, त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागत आहे. सद्यस्थितीमध्ये रुग्णालयात उपचार घेणारे ४९ टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आयसीयू व व्हेंटिलेटर्सची संख्या कमी पडू लागली आहे. कोरोनाची लक्षणे दिसली की, तत्काळ चाचणी केली व उपचार सुरु केल्यास मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो.             

नवी मुंबईमध्येही कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली आहे. रुग्णालयांमधील जागा अपुरी पडू लागली आहे. प्रतिदिन ५ ते ९ जणांचा मृत्यू होत आहे. सर्वच वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे. रुग्णालयात ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर्सची संख्या कमी पडू लागली आहे. सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये वेटिंग लिस्ट लावण्यात आली आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ९६२४ असून, त्यापैकी ४५८१ रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपैकी तब्बल ४९ टक्के रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागत आहे. प्रतिदिन ५२ टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजन मिळविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी टास्क फोर्स तयार करावा लागला आहे. आयसीयू व व्हेंटिलेटर्सची मागणी वाढू लागली आहे. सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. रुग्णांना जागा मिळविताना नातेवाईक, राजकीय कार्यकर्ते व आरोग्य विभाग सर्वांचीच दमछाक हाेत आहे.

ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे तरुणांनाही ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासत आहे. कोरोनाविषयी गैरसमजामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे.  लक्षणे दिसू लागल्यानंतर व रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतरही अनेकजण चाचणी करुन घेत नाहीत. चाचणी केली की, अहवाल पॉझिटीव्हच येतो, असा लोकांनी गैरसमज घेतला जात आहे. लक्षणे दिसल्यानंतर चाचणी करण्याऐवजी फॅमिली डॉक्टरकडून औषधे घेऊन तीन - चार दिवस फुकट घालवले जात आहेत. 

चाचणी पॉझिटिव्हच येते हा गैरसमजकोरोनाची चाचणी केली की, अहवाल पॉझिटीव्हच येतो, हा गैरसमज आहे. नवी मुंबईमध्ये ८ लाख ६२ हजार ६०३ नागरिकांच्या चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी फक्त ८८,०३४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तब्बल ७ लाख ७४ हजार ५५९ चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. फक्त १० टक्के अहवाल पॉझिटिव्ह असून, ९० टक्के निगेटिव्ह आहेत. यामुळे कोणताही गैरसमज करून न घेता लक्षणे दिसली की, चाचणी करणे महत्त्वाचे आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये नागरिकांचे सक्रिय योगदान महत्त्वाचे आहे. कोरोनाची लक्षणे दिसली की, तत्काळ चाचणी करून घेणे आवश्यक आहे. वेळेत उपचार सुरु झाल्यास प्रकृती चिंताजनक होण्याचा व मृत्यू होण्याचा धोका कमी होतो.- अभिजीत बांगर, आयुक्त

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या