शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट शहरांमध्ये गावठाण उपेक्षित

By admin | Updated: December 23, 2015 00:39 IST

दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी असेल अशी घोषणा सिडकोने केली आहे. ५३ हजार कोटी रुपये या परिसराच्या विकासासाठी खर्च होणार आहेत.

नामदेव मोरे, नवी मुंबईदक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी असेल अशी घोषणा सिडकोने केली आहे. ५३ हजार कोटी रुपये या परिसराच्या विकासासाठी खर्च होणार आहेत. परंतु ज्यांनी शहर वसविण्यासाठी जमिनी दिल्या त्यांची गावे मात्र बकालच राहणार असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. देशात स्मार्ट सिटी स्पर्धेची चर्चा होवू लागल्यानंतर सिडकोने तातडीने दक्षिण नवी मुंबईची घोषणा केली. खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा, पनवेल, उलवे, द्रोणागिरी परिसराचा यामध्ये समावेश असणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, जेएनपीटीचे विस्तारीकरण व इतर करोडो रुपयांचे प्रस्ताव व त्यांचे संकल्पचित्र दाखवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर कसे असेल व त्यामध्ये काय आधुनिक सुविधा असतील याची माहिती दिली. परंतु नेहमीप्रमाणे यावेळीही सिडकोला प्रकल्पग्रस्तांचा विसर पडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या समोर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी तीन वर्षात स्मार्ट सिटी उभी राहिलेली असेल. या परिसरात तब्बल ५३ हजार कोटी रुपयांची गुुंतवणूक केली जाणार असून त्यामधील ३४७०० कोटी रुपये सिडको स्वत: खर्च करणार आहे. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा शहरात दिल्या जाणार आहेत. सिडको कोणते प्रकल्प राबविणार, ते कधी पूर्ण होणार याची माहिती दिली आहे. स्मार्ट व्हिलेज बनविण्याचे सूतोवाचही यामध्ये केले आहे. परंतु प्रत्यक्षात त्यासाठी २०० कोटी रुपयांचीच तरतूद केली आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातील ९५ गावांमधील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली आहे. यामधील ३० गावे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये असून दक्षिण नवी मुंबईमध्ये उर्वरित जवळपास ६५ गावे आहेत. ३ कोटी रुपयांमध्ये गावांचा विकास कसा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जासई लढ्यात ७ शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करले. यानंतर साडेबारा टक्के योजना सरकारने जाहीर केली. २५ वर्षे झाल्यानंतरही अद्याप सर्व शेतकऱ्यांना भूखंडांचे वाटप करता आलेले नाही.