शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

स्मार्ट शहरांमध्ये गावठाण उपेक्षित

By admin | Updated: December 23, 2015 00:39 IST

दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी असेल अशी घोषणा सिडकोने केली आहे. ५३ हजार कोटी रुपये या परिसराच्या विकासासाठी खर्च होणार आहेत.

नामदेव मोरे, नवी मुंबईदक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी असेल अशी घोषणा सिडकोने केली आहे. ५३ हजार कोटी रुपये या परिसराच्या विकासासाठी खर्च होणार आहेत. परंतु ज्यांनी शहर वसविण्यासाठी जमिनी दिल्या त्यांची गावे मात्र बकालच राहणार असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. देशात स्मार्ट सिटी स्पर्धेची चर्चा होवू लागल्यानंतर सिडकोने तातडीने दक्षिण नवी मुंबईची घोषणा केली. खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा, पनवेल, उलवे, द्रोणागिरी परिसराचा यामध्ये समावेश असणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, जेएनपीटीचे विस्तारीकरण व इतर करोडो रुपयांचे प्रस्ताव व त्यांचे संकल्पचित्र दाखवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर कसे असेल व त्यामध्ये काय आधुनिक सुविधा असतील याची माहिती दिली. परंतु नेहमीप्रमाणे यावेळीही सिडकोला प्रकल्पग्रस्तांचा विसर पडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या समोर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी तीन वर्षात स्मार्ट सिटी उभी राहिलेली असेल. या परिसरात तब्बल ५३ हजार कोटी रुपयांची गुुंतवणूक केली जाणार असून त्यामधील ३४७०० कोटी रुपये सिडको स्वत: खर्च करणार आहे. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा शहरात दिल्या जाणार आहेत. सिडको कोणते प्रकल्प राबविणार, ते कधी पूर्ण होणार याची माहिती दिली आहे. स्मार्ट व्हिलेज बनविण्याचे सूतोवाचही यामध्ये केले आहे. परंतु प्रत्यक्षात त्यासाठी २०० कोटी रुपयांचीच तरतूद केली आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातील ९५ गावांमधील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली आहे. यामधील ३० गावे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये असून दक्षिण नवी मुंबईमध्ये उर्वरित जवळपास ६५ गावे आहेत. ३ कोटी रुपयांमध्ये गावांचा विकास कसा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जासई लढ्यात ७ शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करले. यानंतर साडेबारा टक्के योजना सरकारने जाहीर केली. २५ वर्षे झाल्यानंतरही अद्याप सर्व शेतकऱ्यांना भूखंडांचे वाटप करता आलेले नाही.