शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

स्मार्ट शहरांमध्ये गावठाण उपेक्षित

By admin | Updated: December 23, 2015 00:39 IST

दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी असेल अशी घोषणा सिडकोने केली आहे. ५३ हजार कोटी रुपये या परिसराच्या विकासासाठी खर्च होणार आहेत.

नामदेव मोरे, नवी मुंबईदक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी असेल अशी घोषणा सिडकोने केली आहे. ५३ हजार कोटी रुपये या परिसराच्या विकासासाठी खर्च होणार आहेत. परंतु ज्यांनी शहर वसविण्यासाठी जमिनी दिल्या त्यांची गावे मात्र बकालच राहणार असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. देशात स्मार्ट सिटी स्पर्धेची चर्चा होवू लागल्यानंतर सिडकोने तातडीने दक्षिण नवी मुंबईची घोषणा केली. खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा, पनवेल, उलवे, द्रोणागिरी परिसराचा यामध्ये समावेश असणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, जेएनपीटीचे विस्तारीकरण व इतर करोडो रुपयांचे प्रस्ताव व त्यांचे संकल्पचित्र दाखवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर कसे असेल व त्यामध्ये काय आधुनिक सुविधा असतील याची माहिती दिली. परंतु नेहमीप्रमाणे यावेळीही सिडकोला प्रकल्पग्रस्तांचा विसर पडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या समोर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी तीन वर्षात स्मार्ट सिटी उभी राहिलेली असेल. या परिसरात तब्बल ५३ हजार कोटी रुपयांची गुुंतवणूक केली जाणार असून त्यामधील ३४७०० कोटी रुपये सिडको स्वत: खर्च करणार आहे. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा शहरात दिल्या जाणार आहेत. सिडको कोणते प्रकल्प राबविणार, ते कधी पूर्ण होणार याची माहिती दिली आहे. स्मार्ट व्हिलेज बनविण्याचे सूतोवाचही यामध्ये केले आहे. परंतु प्रत्यक्षात त्यासाठी २०० कोटी रुपयांचीच तरतूद केली आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातील ९५ गावांमधील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली आहे. यामधील ३० गावे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये असून दक्षिण नवी मुंबईमध्ये उर्वरित जवळपास ६५ गावे आहेत. ३ कोटी रुपयांमध्ये गावांचा विकास कसा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जासई लढ्यात ७ शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करले. यानंतर साडेबारा टक्के योजना सरकारने जाहीर केली. २५ वर्षे झाल्यानंतरही अद्याप सर्व शेतकऱ्यांना भूखंडांचे वाटप करता आलेले नाही.