शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या सागरगडाकडे दुर्लक्ष; दुर्गरक्षक जपतात वारसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 01:58 IST

श्रमदानातून संवर्धनाचे काम, शासनाचे दुर्लक्ष

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : अलिबाग समुद्रकिनाऱ्यासह धरमतर खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या सागरगडाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या या किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी दुर्गरक्षक सामाजिक संस्था व दुर्गप्रेमी नागरिक अथक परिश्रम घेत आहे. श्रमदान मोहिमांच्या माध्यमातून गडावरील बुरुज, पाण्याची टाकी व इतर बांधकामांचे संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. 

रायगड जिल्ह्यातील प्रमुख गड, किल्यांमध्ये सागरगडाचाही समावेश होतो. गडावर सद्यस्थितीमध्येही चौफेर तटबंदी व बुरुज पाहावयास मिळत आहेत. जुन्या बांधकामाचे अवशेष, पाण्याची टाकी व इतर अनेक अवशेष पाहावयास मिळतात. दुर्लक्षित राहिलेल्या गडाचा इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास शासन व प्रशासन  अपयशी ठरले आहे.  अद्याप संरक्षित स्मारकामध्येही सागरगडाचा समावेश झालेला नाही. संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा, यासाठी शिवप्रेमी सातत्याने  पाठपुरावा करत आहेत. दुर्गरक्षक सामाजिक संस्थेच्या वतीने सातत्याने श्रमदान मोहिमांचे आयोजन केले जात आहे.

ऐतिहासिक महत्त्वइ. स. १६६०मध्ये सागरगड स्वराज्यात आला. पुरंदरच्या तहामध्ये सागर गड उर्फ खेडदुर्ग किल्लाही मोगलांना देण्यात आला.  . पाच वर्षांत तो पुन्हा स्वराज्यात आणला. खंदेरी किल्ल्यावरील युद्धामध्ये २५ इंग्रजांना कैद करून त्यांनी सागरगडावर ठेवण्यात आले होते. १८१८ मध्ये सागरगड इंग्रजांच्या ताब्यात गेला 

सागरगडाची डागडुजीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सात वर्षांपासून दुर्गरक्षक सामाजिक संस्थेच्या वतीने श्रमदानातून संवर्धनाचे काम सुरू आहे. तटबंदी व बुरुजांमधील झुडपे काढली जात आहेत. पाण्याची टाकी साफ केली आहेत. पायवाटा व्यवस्थित करण्यात आल्या आहेत. 

सागरगडाचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आम्ही नियमित श्रमदान मोहिमांचे आयोजन करतो. संरक्षित स्मारक घोषित करण्यासह संवर्धनासाठी शासनाकडेही पाठपुरावा करत आहोत. - श्रीकांत पाटील, अध्यक्ष दुर्गरक्षक सामाजिक संस्था अलिबाग

 सागरगड पाहण्यासाठी राज्यभरातील शिवप्रेमी वर्षभर येथे भेटी देत असतात. दुर्गरक्षक सामाजिक संस्थेच्या वतीने संवर्धनासाठी उत्तम काम सुरू आहे. शासनाने आवश्यक ती मदत करावी.  -गणेश माने, गडप्रेमी 

 

टॅग्स :Fortगड