शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

जुन्या धरणांतील गाळ उपसणे गरजेचे

By admin | Updated: April 21, 2016 02:46 IST

नवीन धरणे बांधण्यापेक्षा जुन्या धरणांतील गाळ उपसणे गरजेचे आहे. गावे टँकरमुक्त करण्यासाठीच जलसंवर्धनाची चळवळ उभारली जात आहे

अलिबाग : नवीन धरणे बांधण्यापेक्षा जुन्या धरणांतील गाळ उपसणे गरजेचे आहे. गावे टँकरमुक्त करण्यासाठीच जलसंवर्धनाची चळवळ उभारली जात आहे. पावसाचे पाणी भूगर्भात जिरवून पाण्याची पातळी वाढविली, तर पाण्याची कमतरता भासणार नाही, असा ज्ञानरूपी संदेश सचिन धर्माधिकारी यांनी दिला.डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जलसंवर्धनांतर्गत जिल्ह्यातील विहिरींची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुधवारी जिल्ह्यातील २४८ विहिरींची स्वच्छता करण्यात आली. अलिबाग तालुक्यातील खंडाळे येथील विहिरीच्या सफाईला सुरुवात करून या मोहिमेचा शुभारंभ सचिन यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. औद्योगिक आणि विद्युत कारणांमुळे पाणी सर्वाधिक वाया जाते. पारंपरिक पाणी काढण्याच्या पध्दती लोप पावल्या आहेत. पाण्याचा उपसा ज्याप्रमाणात होतो त्या प्रमाणात पाण्याचे पुनर्भरण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)