शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 02:16 IST

दिवसेंदिवस शहरात अपघातांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. याकरिता प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे.

पनवेल : दिवसेंदिवस शहरात अपघातांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. याकरिता प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतल्यास, अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता, प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केले.पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बस चालक, मालक, शाळेचे प्राचार्य, विद्यार्थी, पालक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.नजीकच्या काळात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया बस चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. अनेक वेळा या बसेसमध्ये विद्यार्थ्यांसोबत गैरव्यवहार होतात. मात्र, या घटना टाळण्यासाठी पालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपली जबाबदारी एकमेकांवर न टाकता प्रत्येकाने सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, असे हेमांगिनी पाटील यांनी सांगितले.उपस्थितांमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, पोलीस उपायुक्त राजेंद्र माने, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त नितीन पवार, सतीश देशमुख, पनवेलचे गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे, पनवेल शहर वाहतूक विजय कादबाने आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना उपस्थित पालकांना व बस चालक मालक, शिक्षकांना करण्यात आल्या. उपस्थितांना वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी व होणारे अपघात टाळण्यासाठी चित्रफीत दाखवून अपघातांच्या संदर्भात उपस्थितांना जागृत करण्यात आले. कार्यशाळेदरम्यान पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहतूक नियमांच्या माहितीसंदर्भात स्कूल बस धोरणाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई