शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

आपत्ती टाळण्याच्या दृष्टीने सतर्क असणे आवश्यक

By admin | Updated: May 10, 2017 00:17 IST

आपत्ती टाळण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच मान्सूनपूर्व कोकण विभागातील शासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई: आपत्ती टाळण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच मान्सूनपूर्व कोकण विभागातील शासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्याकरिता मंगळवारी बेलापूर येथील कोकण विभागीय कार्यालयात जिल्हानिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी आराखडा तयार करावा. तसेच सर्व जिल्ह्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागात आवश्यक ती माहिती अद्ययावत करावी, असे निर्देश उपायुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिले. कोकण विभागातील सर्व नियंत्रण कक्ष २४ तास सुरु ठेवून जेथे जेथे आवश्यक असेल तेथे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. तसेच आपत्ती काळात तात्काळ मदत करु न आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपायुक्त यांनी केले आहे. अवेळी पावसाने विजा पडण्याचे प्रमाण वाढले आहे वीज कोसळल्याने मनुष्यहानीसह वित्तहानीही मोठ्या प्रमाणात होत आहे.यादृष्टीने विभागात बसविण्यात आलेल्या वीजरोधक सुस्थितीत आहे किंवा नाही हे त्वरित पाहण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.पावसाळ्यात बऱ्याचदा कोकण रेल्वेच्या मार्गात दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. त्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी मुंबई शहर बन्सी गवळी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग विजय जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी ठाणे, वंदना सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका अंकुश चव्हाण, मीरा -भार्इंदर महानगरपालिका उपायुक्त दीपक पुजारी, वसई - विरार महानगरपालिका उपायुक्त अजीज शेख, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर आदी उपस्थित होते. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यातील तसेच सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे आदी विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.कोकण विभागात बऱ्याच ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असते. पूर रेषा निश्चित करणे, रस्त्यांची व पुलांची दुरु स्ती, औषध उपलब्धता, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, तात्पुरते निवारे, आरोग्य व स्वच्छता ठेवणे या अनुषंगाने केलेल्या कामाचा देखील बैठकीत आढावा घेण्यात आला.