शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

‘आपले सरकार’वर नवी मुंबईकरांची निराशा; आॅनलाइन अर्ज भरण्यात अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 02:29 IST

‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर तालुक्यांमध्ये नवी मुंबईचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. यामुळे नवी मुंबईतील रहिवाशांकडून केल्या जाणा-या अर्जाची पूर्तता करण्यात अडथळा येत आहे. परिणामी नागरिकांना महा-ई-सेवा केंद्रांकडे धाव घ्यावी लागत असून, अतिरिक्त पैसे देखील मोजावे लागत आहेत.

नवी मुंबई : ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर तालुक्यांमध्ये नवी मुंबईचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. यामुळे नवी मुंबईतील रहिवाशांकडून केल्या जाणा-या अर्जाची पूर्तता करण्यात अडथळा येत आहे. परिणामी नागरिकांना महा-ई-सेवा केंद्रांकडे धाव घ्यावी लागत असून, अतिरिक्त पैसे देखील मोजावे लागत आहेत.नागरिकांना घरबसल्या सुविधांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनातर्फे ‘आपले सरकार’ वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे. मागील दोन वर्षात या संकेतस्थळाला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे, परंतु या संकेतस्थळाचा वापरकर्त्यांपैकी नवी मुंबईकरांची मात्र घोर निराशा होत आहे. आपले सरकारच्या माध्यमातून राज्यातील शासनाच्या ३९ विभागातील ३९९ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांच्या माध्यमातून नागरिक घरबसल्या जन्मदाखला, सातबारा, उत्पन्नाचा दाखला याशिवाय शेतीविषयक अथवा विविध परवाने प्राप्त करून घेवू शकत आहे. त्याकरिता वेबसाइटवर स्वत:ची नोंदणी केल्यानंतर आॅनलाइन अर्ज भरला जातो. मात्र हा अर्ज भरतेवेळी ज्यांचे वास्तव्य नवी मुंबईत आहे, त्यांना नवी मुंबईतील एखाद्या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्यापुढे अडथळा निर्माण झालेला आहे. जिल्ह्याची निवड केल्यानंतर तालुका निवडताना त्यात नवी मुंबईचा उल्लेखच केलेला नाही. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांचा उल्लेख आहे. केवळ नवी मुंबईचा उल्लेख नसल्याने त्या क्षेत्रातील वास्तव्याचे ठिकाण निवडण्यात अडचणी येत आहेत. तालुक्याचाच उल्लेख नसल्याने त्यापुढच्या रकान्यात गावाचा (ग्रामपंचायत) उल्लेख होवू शकत नाही.अर्जाच्या सुरवातीलाच अडथळा निर्माण होवून अर्जदारांची घोर निराशा होत आहे. जन्मदाखला, विवाह नोंदणी, रहिवासी दाखला यासह इतर अनेक दाखल्यांच्या बाबतीत ही समस्या समोर आली आहे. ‘आपले सरकार’ संकेतस्थळ सुरू झाल्यापासून ही परिस्थिती कायम आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई