शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई : विमानतळाच्या कामात खंड पडणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 02:29 IST

देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कामाला गती दिली आहे.

कमलाकर कांबळेनवी मुंबई : देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कामाला गती दिली आहे. परंतु शनिवारी उलवे टेकडीच्या उत्खननासाठी पेरलेल्या सुरुंगाच्या स्फोटात सहा जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे या उत्खननाच्या कामाला स्थानिक ग्रामस्थांचा असलेला विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी विमानतळाच्या कामात कोणताही खंड पडू दिला जाणार नाही, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.माहिती व तंत्रज्ञानाचे एक आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली आहे. आता प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाची भर पडली आहे. विमानतळ प्रकल्पामुळे नवी मुंबईला ख-या अर्थाने ग्लोबल लूक प्राप्त होणार आहे. देशातील पहिले ग्रीन फिल्ड विमानतळ म्हणून या विमानतळाला मान मिळणार आहे. या विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक अशा महत्त्वाच्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. या विमानतळाच्या उभारणीसाठी जीव्हीके या कंपनीची ठेकेदार म्हणून निवड करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन हजार कोटी रुपयांची प्रकल्पपूर्व कामे सुरू करण्यात आली आहे. यात नदीचे पात्र बदलणे, उलवे टेकडीची उंची कमी करणे, उच्च विद्युत दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आणि जमिनीचे सपाटीकरण आदी कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.विशेष म्हणजे भूसंपादन आणि पुनर्वसनाचा प्रश्न सुध्दा मार्गी लागला आहे. विमानतळाच्या गाभा क्षेत्रात असणाºया दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे, परंतु वरचे ओवळा गावातील ग्रामस्थांचा स्थलांतराला संमिश्र विरोध आहे. टेकडीच्या उत्खननामुळे गावांतील घरांना तडे जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.या विरोधात येथील ग्रामस्थांनी तीन दिवसांपूर्वी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडकोवर मोर्चा काढला होता. यातच ही दुर्घटना घडल्याने हा विरोध आणखी तीव्र होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.तसे झाल्यास टेकडी उत्खननाच्या कामाला खीळ बसून त्याचा फटका संपूर्ण विमानतळ प्रकल्पाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी प्रकल्पपूर्व कामांत कोणताही खंड पडू दिला जाणार नाही, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.सहकार्य करण्याचे सिडकोचे आवाहन उलवे टेकडीचे काम अत्यंत नियोजनबद्धरीत्या सुरू आहे. हे काम अत्यंत जोखमीचे असल्याने सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत आहे. त्यातही शनिवारची दुर्दैवी घटना घडली. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गावांनी स्थलांतरित होणा-या गावांतील अनेक ग्रामस्थांनी संमतीपत्रे दिली आहेत. पुनर्वसन आणि पुन:स्थापन योजनेअंतर्गतचा लाभ ही स्वीकारला आहे. त्यानंतरही प्रत्यक्ष स्थलांतर केले जात नसल्याचे दिसून आले आहे. ही बाब विमानतळ प्रकल्पाच्या मार्गात अडथळा निर्माण करणारी असल्याने ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ