शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई : विमानतळाच्या कामात खंड पडणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 02:29 IST

देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कामाला गती दिली आहे.

कमलाकर कांबळेनवी मुंबई : देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कामाला गती दिली आहे. परंतु शनिवारी उलवे टेकडीच्या उत्खननासाठी पेरलेल्या सुरुंगाच्या स्फोटात सहा जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे या उत्खननाच्या कामाला स्थानिक ग्रामस्थांचा असलेला विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी विमानतळाच्या कामात कोणताही खंड पडू दिला जाणार नाही, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.माहिती व तंत्रज्ञानाचे एक आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली आहे. आता प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाची भर पडली आहे. विमानतळ प्रकल्पामुळे नवी मुंबईला ख-या अर्थाने ग्लोबल लूक प्राप्त होणार आहे. देशातील पहिले ग्रीन फिल्ड विमानतळ म्हणून या विमानतळाला मान मिळणार आहे. या विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक अशा महत्त्वाच्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. या विमानतळाच्या उभारणीसाठी जीव्हीके या कंपनीची ठेकेदार म्हणून निवड करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन हजार कोटी रुपयांची प्रकल्पपूर्व कामे सुरू करण्यात आली आहे. यात नदीचे पात्र बदलणे, उलवे टेकडीची उंची कमी करणे, उच्च विद्युत दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आणि जमिनीचे सपाटीकरण आदी कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.विशेष म्हणजे भूसंपादन आणि पुनर्वसनाचा प्रश्न सुध्दा मार्गी लागला आहे. विमानतळाच्या गाभा क्षेत्रात असणाºया दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे, परंतु वरचे ओवळा गावातील ग्रामस्थांचा स्थलांतराला संमिश्र विरोध आहे. टेकडीच्या उत्खननामुळे गावांतील घरांना तडे जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.या विरोधात येथील ग्रामस्थांनी तीन दिवसांपूर्वी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडकोवर मोर्चा काढला होता. यातच ही दुर्घटना घडल्याने हा विरोध आणखी तीव्र होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.तसे झाल्यास टेकडी उत्खननाच्या कामाला खीळ बसून त्याचा फटका संपूर्ण विमानतळ प्रकल्पाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी प्रकल्पपूर्व कामांत कोणताही खंड पडू दिला जाणार नाही, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.सहकार्य करण्याचे सिडकोचे आवाहन उलवे टेकडीचे काम अत्यंत नियोजनबद्धरीत्या सुरू आहे. हे काम अत्यंत जोखमीचे असल्याने सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत आहे. त्यातही शनिवारची दुर्दैवी घटना घडली. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गावांनी स्थलांतरित होणा-या गावांतील अनेक ग्रामस्थांनी संमतीपत्रे दिली आहेत. पुनर्वसन आणि पुन:स्थापन योजनेअंतर्गतचा लाभ ही स्वीकारला आहे. त्यानंतरही प्रत्यक्ष स्थलांतर केले जात नसल्याचे दिसून आले आहे. ही बाब विमानतळ प्रकल्पाच्या मार्गात अडथळा निर्माण करणारी असल्याने ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ