शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई अंतर्गत ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:17 IST

१६६७ अर्ज पहिल्या सोडतीत यशस्वी : शाळेत प्रवेशाची अंतिम मुदत ४ मे

योगेश पिंगळेनवी मुंबई : शासनाच्या आरटीई योजनेअंतर्गत २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातून भरण्यात आलेल्या अर्जांपैकी पहिल्याच सोडतीमध्ये तब्बल १६६७ अर्जदार यशस्वी ठरले आहेत. ठाणे जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबई शहराने अव्वल स्थान पटकाविले आहे. सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी झाल्यावर प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ४ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलमानुसार अल्पसंख्याक शाळा वगळून मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांमध्ये वंचित गटातील व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली किंवा पूर्वप्राथमिक वर्गात २५ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शाळांमध्ये प्रवेश घेण्याची संख्या वाढली असून मोठ्या प्राणावर अर्ज केले जात आहेत.या योजनेअंतर्गत २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात १४५२, २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात १९१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. महापालिकेच्या माध्यमातून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, यामुळे पालकांचाही मोठा सहभाग लाभला. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी केलेल्या अर्जाची काही दिवसांपूर्वी पहिलीच सोडत काढण्यात आली आहे. यात नवी मुंबईतील तब्बल १६६७ अर्जदार यशस्वी झाले आहेत.

पहिल्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असून, यासाठी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. छाननी झालेल्या ८३० विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून पत्रदेखील देण्यात आली आहेत. या यादीमधील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ४५ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.२०१९-२० पहिल्या सोडतीमध्ये यशस्वी विद्यार्थीठाणे जिल्ह्यातील शहरे शाळा यशस्वी विद्यार्थीअंबरनाथ ५५ ५२४भिवंडी (शहरी) २८ ५८१भिवंडी (ग्रामीण) ३४ ८७कल्याण (ग्रामीण) ५३ ३२६कल्याण-डोंबिवली ८१ ७२३मीरा-भाईंदर ९१ ३६मुरबाड १५ १८नवी मुंबई १०५ १६६७शहापूर ३४ २३७ठाणे (शहरी) ७६ ५५८ठाणे (ग्रामीण) ६३ ८६७उल्हासनगर १७ २७२नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आरटीई कायद्याची नवी मुंबई शहरात प्रभावीपणे अंमलबजावणी करून शहरातील पालकांमध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती. पालकांना प्रवेश अर्ज भरण्याकरिता शहरात विविध ठिकाणी केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे पालकांनाही मदत झाली.- संदीप संगवे, शिक्षणाधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता