शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

आरटीई अंतर्गत ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:17 IST

१६६७ अर्ज पहिल्या सोडतीत यशस्वी : शाळेत प्रवेशाची अंतिम मुदत ४ मे

योगेश पिंगळेनवी मुंबई : शासनाच्या आरटीई योजनेअंतर्गत २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातून भरण्यात आलेल्या अर्जांपैकी पहिल्याच सोडतीमध्ये तब्बल १६६७ अर्जदार यशस्वी ठरले आहेत. ठाणे जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबई शहराने अव्वल स्थान पटकाविले आहे. सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी झाल्यावर प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ४ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलमानुसार अल्पसंख्याक शाळा वगळून मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांमध्ये वंचित गटातील व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली किंवा पूर्वप्राथमिक वर्गात २५ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शाळांमध्ये प्रवेश घेण्याची संख्या वाढली असून मोठ्या प्राणावर अर्ज केले जात आहेत.या योजनेअंतर्गत २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात १४५२, २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात १९१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. महापालिकेच्या माध्यमातून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, यामुळे पालकांचाही मोठा सहभाग लाभला. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी केलेल्या अर्जाची काही दिवसांपूर्वी पहिलीच सोडत काढण्यात आली आहे. यात नवी मुंबईतील तब्बल १६६७ अर्जदार यशस्वी झाले आहेत.

पहिल्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असून, यासाठी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. छाननी झालेल्या ८३० विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून पत्रदेखील देण्यात आली आहेत. या यादीमधील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ४५ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.२०१९-२० पहिल्या सोडतीमध्ये यशस्वी विद्यार्थीठाणे जिल्ह्यातील शहरे शाळा यशस्वी विद्यार्थीअंबरनाथ ५५ ५२४भिवंडी (शहरी) २८ ५८१भिवंडी (ग्रामीण) ३४ ८७कल्याण (ग्रामीण) ५३ ३२६कल्याण-डोंबिवली ८१ ७२३मीरा-भाईंदर ९१ ३६मुरबाड १५ १८नवी मुंबई १०५ १६६७शहापूर ३४ २३७ठाणे (शहरी) ७६ ५५८ठाणे (ग्रामीण) ६३ ८६७उल्हासनगर १७ २७२नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आरटीई कायद्याची नवी मुंबई शहरात प्रभावीपणे अंमलबजावणी करून शहरातील पालकांमध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती. पालकांना प्रवेश अर्ज भरण्याकरिता शहरात विविध ठिकाणी केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे पालकांनाही मदत झाली.- संदीप संगवे, शिक्षणाधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता