शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई देशात सर्वोत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 02:37 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबईचा देशात प्रथम क्रमांक आला आहे.

नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबईचा देशात प्रथम क्रमांक आला आहे. पालिका क्षेत्रातील ७५० मेट्रिक टन घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात असून ८५ टक्के कचºयाचे वर्गीकरण केले जात आहे. या कार्याची दखल केंद्राने घेतली असून पुरस्कारामुळे पालिकेचा बहुमान वाढला आहे.स्वच्छ सर्वेक्षणामध्ये इंदूर, भोपाळ, चंदिगढ या शहरांनी पहिल्या तीन स्वच्छ शहरांचा बहुमान मिळविला आहे. पहिल्या तीनमध्ये येण्याचे नवी मुंबईचे स्वप्न भंगले असले तरी घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात सर्वोत्तम होण्याचा मान मिळाला आहे. महापालिकेने देशातील सर्वोत्तम क्षेपणभूमी तयार केली आहे. शास्त्रोक्त पद्धतीने कचºयाची विल्हेवाट लावली जात आहे. याशिवाय कचरा वर्गीकरणावर विशेष लक्ष दिले आहे. १०० किलोपेक्षा कचरा निर्माण करणाºया सोसायट्या, उद्योग, हॉटेल्स यांना त्यांच्या आवारामध्ये कचºयावर प्रक्रिया करणे सक्तीचे करण्यात आले आहे. पालिकेनेही उद्यानांपासून शाळांपर्यंत सर्व ठिकाणी कचºयावर प्रक्रिया सुरू केली आहे. कचरा वर्गीकरणाचे प्रमाण ८५ टक्के झाले आहे. कचरा वाहतुकीसाठी अत्याधुनिक आरएफआयडी तंत्रप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. अशाप्रकारे तंत्रप्रणाली वापरणारी नवी मुंबई ही देशातील पहिलीच महापालिका आहे. पालिकेने वितरित केलेल्या कचरा कुंड्या व कम्युनिटी बिन्समधील कचरा उचलण्यात आला किंवा नाही याची खातरजमा महापालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षामार्फत केली जात आहे. कचरा वाहतूक करणाºया सर्व वाहनांचे जीपीएस व जीपीआरएस नियंत्रण केले जात आहे.घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेला जाणारा ओला कचरा प्रक्रिया करून सेंद्रिय खतात रूपांतरित केला जात असून त्या खताला शेतीसाठी चांगली मागणी आहे. सुक्या कचºयामधून प्लास्टिक वेगळे करून प्लास्टिक अ‍ॅग्लो तयार केले जातात. ज्याचा वापर प्लास्टिक रिसायकलिंग उद्योगात होत आहे. या अ‍ॅग्लोचा वापर करून दहा रस्ते तयार केले आहेत. नवी मुंबईचा घनकचरा व्यवस्थापनामध्ये प्रथम क्रमांक आल्यामुळे महापौर जयवंत सुतार, आयुक्त रामास्वामी एन. यांच्यासह सर्व पदाधिकाºयांनी समाधान व्यक्त केले आहे.>स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात नवी मुंबई देशात सर्वोत्तम असल्याचा निर्णय हा नवी मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा आहे. याचे सर्व श्रेय संपूर्ण नवी मुंबईकरांचे आहे.- जयवंत सुतार, महापौरस्वच्छता सर्वेक्षणामध्ये आलेला नंबर ही अभिमानाची गोष्ट आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून लागलेली सवय ही कायमस्वरूपी रहावी व स्वच्छतेमधील स्थान कायम उंचावत रहावे यासाठी सर्वांनी जागरूक रहावे.- रामास्वामी एन.,आयुक्त महापालिका