शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: राज्यातील बहिणी केवळ पोस्टवर सुरक्षित, अंबादास दानवेंचा सरकारला टोला

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 29, 2024 17:53 IST

Navi Mumbai News: राज्यातील महिला केवळ पोस्टवर असुरक्षित असल्याचा खोचक टोला विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मारला आहे. अक्षता म्हात्रे व यशश्री शिंदे हत्या प्रकरणात तपास जलद गतीने व्हावा या मागणीसाठी ते पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या भेटीसाठी आले होते.

- सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई -  राज्यातील महिला केवळ पोस्टवर असुरक्षित असल्याचा खोचक टोला विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मारला आहे. अक्षता म्हात्रे व यशश्री शिंदे हत्या प्रकरणात तपास जलद गतीने व्हावा या मागणीसाठी ते पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी राज्याच्या कायदा सुव्यवस्थे बाबत सरकार जागृक नसल्याचे अशा घटनांवरून स्पष्ट होत असल्याचीही टीका त्यांनी केली.

बेलापूर येथील अक्षता म्हात्रे (आगास्कर) यांच्या मारेकरूला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. तर उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्येवरून उरणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या दोन्ही घटनांच्या अनुशंघाने विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सोमवारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही गुन्ह्यांमध्ये तपास बारकाईने व्हावा व पीडित कुटुंबाना न्याय देऊन त्यांचे दुःख कमी करण्यास मदत करावी अशी मागणी आयुक्तांकडे केली. तर या घटनांवरून गृहमंत्र्यांना भेटून काही होऊ शकणार नसल्याने राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान राज्यात लाडकी बहीण असा गवगवा होत असतानाच बहिणींवर अशा प्रकारे अत्याचार घडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यावरून कायदा सुव्यवस्थे बाबत सरकार जागृक नसल्याचीही टीका त्यांनी केली. तर सरकार मजबूत असेल तर सगळ्या गोष्टी मजबूत होत असतात असे म्हणत, सध्या केवळ पोस्टवर महिला सुरक्षित असल्याचीही टीका त्यांनी केली.

यावेळी अक्षता म्हात्रे यांच्या कुटुंबियांसह शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, किशोरी पेडणेकर, संजना घाडी, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, प्रकाश पाटील, सुमित्र कडू, सोमनाथ वास्कर, प्रवीण म्हात्रे, संदीप पाटील, समीर बागवान, महेश कोटीवाले आदी उपस्थित होते. आयुक्तांच्या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयाकडून लागलेल्या बिलाच्या तगाद्यामुळे नरेंद्र गाडे यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बिल वसुलीसाठी सक्ती करणाऱ्या केवळ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी व्यवस्थापनावर देखील गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAmbadas Danweyअंबादास दानवे