शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईकरांनी थकविली तब्बल 64 कोटींची पाणीपट्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:49 IST

१८ टक्के पाणीगळती : शासकीय कार्यालयांनीही थकवले बिल

- योगेश पिंगळे नवी मुंबई : नवी मुंबई शहरात महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात दररोज सुमारे १८.२७ टक्के पाणी गळती होत आहे. शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, सिडको कार्यालय, रेल्वे स्थानके, पोलीस ठाणे आदी ठिकाणी केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याची थकबाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असून, थकलेल्या पाणी बिलापोटी महापालिकेला एकूण सुमारे ६४ कोटी ४७ लाख रुपयांचे येणे बाकी आहे.नवी मुंबई पालिकेच्या स्वतःच्या मालकीचे धरण असल्याने नवी मुंबई शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत नाही. मोरबे धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ८८ मीटर असून, नागरिकांची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज ४५० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. नवी मुंबई शहरात गाव-गावठाण, झोपडपट्टी, शहरी भाग असून, सिडको वसाहती आणि गाव-गावठाणातील घरांना स्वतंत्र नळजोडणी देण्यात आली आहे. शहरातील खासगी गृहसंकुले, सोसायट्याच्या पंप हाऊसमध्ये पाणी पुरवठा केला जातो. झोपडपट्टी भागातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी सार्वजनिक नळांची सुविधा देण्यात आली आहे. पाण्याची चोरी आणि गळती थांबविण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून स्काडा यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. तरी अनेक ठिकाणी पाण्याची चोरी आणि गळती मात्र सुरूच आहे. सद्यस्थितीत शहरात दररोज सुमारे १८.२७ टक्के पाणी गळती होत असल्याचे महापालिकेकडून नोंदविण्यात आले आहे. नवी मुंबई शहरातील शासकीय कार्यालये, सिडको, पोलीस ठाणे, एमटीएनएल कार्यालये, रेल्वे स्थानके, शासकीय बँका आदींना महापालिकेच्या माध्यमातूनच पाणी पुरवठा केला जातो; परंतु या कार्यालयांनी गेल्या काही वर्षांपासून पाणी बिलाचा भरणा केलेला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर थकबाकी महापालिकेला येणे बाकी असून, अनेक नागरिकांनी गेल्या वर्षांपासून पाण्याच्या बिलाचा भरणा केला नाही. २० वर्षांपासून पाणी बिलात वाढ नाही शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिकेला पाणी पुरवठा सुविधेसाठी होणारा खर्च पाण्याच्या बिलामधून वसूल होणे अपेक्षित आहे; परंतु नवी मुंबई शहरात गेल्या २० वर्षांपासून पाणी बिलात कोणत्याही प्रकारे वाढ झाली नाही. त्यामुळे वाढलेल्या खर्चाचा ताळमेळ बसविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी अनेक समस्या येत आहेत.पाणीकर थकलानवी मुंबई महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा सुविधेचा सुमारे सुमारे ६४ कोटी ४७ लाख रुपयांचा कर थकला आहे. यामध्ये प्रामुख्याने शासकीय कार्यालयांचा प्रलंबित पाणीकर मोठ्या प्रमाणावर असून, अनेक नागरिकांनीही बिले भरलेली नाहीत.पाणी गळती रोखण्यासाठी स्काडा यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयांकडे असलेल्या पाणी बिलाच्या थकबाकीसाठी परस्पर सहमतीने समायोजन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.- अभिजित बांगर आयुक्त, न.मुं.म.पा.महापालिकेच्या हद्दीबाहेर             ४० एमएलडी पाणीपुरवठा पनवेल महापालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याने नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून दररोज खारघर विभागासाठी १० एमएलडी आणि कामोठे विभागासाठी २५ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो, तसेच मोरबे धरण क्षेत्रात दररोज पाच एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. 

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका