शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Navi Mumbai: डबके, खदान तलाव ठरतायेत मृत्यूचे दरवाजे, प्रशासनाचे दुर्लक्ष

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 10, 2024 19:44 IST

नवी मुंबई शहरात ठिकठिकाणी असलेले डबके, खदान तलाव मृत्यूचे दरवाजे ठरत आहेत. प्रतिवर्षी पावसाळ्यात अशा ठिकाणी पोहण्यासाठी गेलेले तरुण, मुले बुडण्याचे प्रकार घडतात. त्यानंतरही पावसाळ्यापूर्वीच अशी ठिकाणे बंदिस्त करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे.

- सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई - शहरात ठिकठिकाणी असलेले डबके, खदान तलाव मृत्यूचे दरवाजे ठरत आहेत. प्रतिवर्षी पावसाळ्यात अशा ठिकाणी पोहण्यासाठी गेलेले तरुण, मुले बुडण्याचे प्रकार घडतात. त्यानंतरही पावसाळ्यापूर्वीच अशी ठिकाणे बंदिस्त करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे. परिणामी मंगळवारी जुईनगर येथील तरुणाचा बळी गेला आहे. या घटनेनंतर तरी प्रशासनाचे डोळे उघडतील का याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

पावसाळा आला कि अनेकांना पोहण्याचा मोह अनावर होतो. अशावेळी साचलेले पाणी दिसेल त्याठिकाणी अनेकजण डुबक्या मारत असतात. नवी मुंबईत मोठ्या संख्येने खदान तलाव तसेच बांधकामासाठी खोदलेले खड्डे आहेत. सुरक्षेची कोणतीही ठोस उपाय योजना न राबवता अशी ठिकाणे उघडीच पडलेली असतात. त्यामुळे पावसाळ्यात अशा ठिकाणी पाणी साचताच त्याठिकाणी पोहण्याची हौस भागवणाऱ्यांची गर्दीत होत असते. त्यातूनच बुडून जीव जाण्याच्या घटना घडत असतात. नवी मुंबईत प्रतिवर्षी अशा घटना घडत असतानाही उघड्यावर असलेले जीवघेणे डबके बंदिस्त करण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. 

परिणामी मंगळवारी जुईनगर येथे राहणाऱ्या राज सनगरे (२८) याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. तो पट्टीचा पोहणारा असून देखील दारूच्या नशेत बांधकामासाठी खोदलेल्या डबक्यात पोहण्यासाठी उतरला होता. मात्र गाळामध्ये पाय रुतल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. सदर ठिकाण धोकादायक असतानाही ते बंदिस्त करण्यात आले न्हवते. यामुळे संबंधित विकासकावर तसेच घटनास्थळाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी होत आहे. गतवर्षी देखील घणसोली, तुर्भे एमआयडीसी, दिघा, तळोजा, पडघा  परिसरात अशा प्रकारच्या दुर्घटना घडलेल्या आहेत. त्यानंतरही वर्षानुवर्षे अशी ठिकाणे प्रशासनाच्या नजरेतही दुर्लक्षित राहत असल्याने प्रतिवर्षी अनेकांचे जीव जात आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईdrowningपाण्यात बुडणे