शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

नवी मुंबईत  मान्सूनपूर्व कामांचा धडाका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 04:18 IST

दोन दिवसांपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नवी मुंबई - दोन दिवसांपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. असे असतानाही महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली मान्सूनपूर्व कामे अद्याप सुरूच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर शहरातील नालेसफाई आणि रस्त्यांच्या डागडुजीची कामे हाती घेतली जातात. मे महिन्याच्या अखेरीस ही कामे पूर्ण होणे अपेक्षित असते. परंतु यावर्षी ही कामे उशिरा सुरू करण्यात आली. त्यामुळे अनेक भागात नालेसफाईच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. विशेषत: ऐरोली व दिघा परिसरात पहिल्याच पावसात नाले तुडुंब भरल्याचे पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे यावर्षी पावसाने लवकरच हजेरी लावली. त्यामुळे सुरू असलेल्या कामांना खीळ बसली.दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने झालेल्या कामांचे पितळही उघडे पडले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. वृक्ष छाटणी न झाल्याने शहराच्या विविध भागात वृक्ष पडल्याच्या दुर्घटना घडल्या.पावसाच्या पहिल्याच सरीत रस्त्यांवरील डागडुजी तकलादू ठरली. त्यामुळे ठिकठिकाणचे रस्ते उखडल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे. रविवारी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने महापालिकेने पुन्हा या कामांना गती दिली आहे. रस्ते व पदपथांच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.शहरात पाणी तुंबण्याची शक्यतानालेसफाईचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी वसाहतीअंतर्गत छोट्या नाल्यांतील गाळ उपसण्याचा सोपस्कार पूर्ण केल्याचे दिसून येते. तसेच मोठ्या नाल्यांतील गाळ यावर्षी उपसण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबून त्यातील पाणी वसाहतीत घुसण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या