शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

नवी मुंबईत  मान्सूनपूर्व कामांचा धडाका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 04:18 IST

दोन दिवसांपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नवी मुंबई - दोन दिवसांपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. असे असतानाही महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली मान्सूनपूर्व कामे अद्याप सुरूच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर शहरातील नालेसफाई आणि रस्त्यांच्या डागडुजीची कामे हाती घेतली जातात. मे महिन्याच्या अखेरीस ही कामे पूर्ण होणे अपेक्षित असते. परंतु यावर्षी ही कामे उशिरा सुरू करण्यात आली. त्यामुळे अनेक भागात नालेसफाईच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. विशेषत: ऐरोली व दिघा परिसरात पहिल्याच पावसात नाले तुडुंब भरल्याचे पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे यावर्षी पावसाने लवकरच हजेरी लावली. त्यामुळे सुरू असलेल्या कामांना खीळ बसली.दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने झालेल्या कामांचे पितळही उघडे पडले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. वृक्ष छाटणी न झाल्याने शहराच्या विविध भागात वृक्ष पडल्याच्या दुर्घटना घडल्या.पावसाच्या पहिल्याच सरीत रस्त्यांवरील डागडुजी तकलादू ठरली. त्यामुळे ठिकठिकाणचे रस्ते उखडल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे. रविवारी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने महापालिकेने पुन्हा या कामांना गती दिली आहे. रस्ते व पदपथांच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.शहरात पाणी तुंबण्याची शक्यतानालेसफाईचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी वसाहतीअंतर्गत छोट्या नाल्यांतील गाळ उपसण्याचा सोपस्कार पूर्ण केल्याचे दिसून येते. तसेच मोठ्या नाल्यांतील गाळ यावर्षी उपसण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबून त्यातील पाणी वसाहतीत घुसण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या