शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कृत्रिम तलावांचा नवी मुंबई पॅटर्न; पहिल्याच दिवशी ३,२२५ गणरायांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 00:39 IST

१३५ तलावांची निर्मिती; पर्यावरणाचेही संवर्धन

नवी मुंबई : पर्यावरण रक्षण व सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, यासाठी महानगरपालिकेने २३ मुख्य विसर्जन स्थळाव्यतिरिक्त तब्बल १३५ कृत्रिम तलाव तयार केले आहेत. पहिल्याच दिवशी या ठिकाणी ३,२२५ गणरायांना निरोप देण्यात आला. यापुढेही याविषयी व्यापक जनजागृती करून पर्यावरण संवर्धन व कोरोना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून शहरातील २३ तलावांमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येते. यापूर्वी कोपरीमध्ये कृत्रिम तलाव निर्माण केला जात होता, परंतु त्याला भाविकांकडूनही प्रतिसाद मिळत नव्हता. कोपरीमधील तलाव गणेशभक्तांसाठीही गैरसोयीचा होता. या वर्षी आयुक्त अभिजीत बांगर यांनी नागरिकांच्या सोयीप्रमाणे उद्यान, मैदान, बसडेपो व इतर मोकळ्या जागेवर कृत्रिम तलाव निर्माण करण्याचे आदेश दिले होते. मनपाच्या अभियांत्रिकी विभागाने तब्बल १३५ ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली.

प्रत्येक तलावावर स्वयंसेवक, सफाई कामगार, मनपाचे अभियंते तैनात करण्यात आले होते. माजी नगरसेवक, सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी व्यापक जनजागृती केली होती. या सर्वांचा सकारात्मक परिणाम होऊन रविवारी पहिल्या दिवशी नागरिकांकडून कृत्रिम तलावांना चांगला प्रतिसाद मिळाला. ३,१०० घरगुती व १२५ सार्वजनिक गणरायांना कृत्रिम तलावांमध्ये निरोप देण्यात आला आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला आहे. कृत्रिम तलावांनाही पसंती दिली जात आहे. कृत्रिम तलाव नक्की कुठे आहेत, याविषयी लोकप्रतिनिधींनीही जनजागृती केली होती. अनंत चतुर्थीपर्यंत लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांमध्ये अशाच प्रकारे जनजागृती केली, तर अजून प्रतिसाद वाढू शकणार आहे. पहिल्या दिवशी कृत्रिम तलावांमध्ये ३,२२५ व पारंपरिक तलावांमध्ये ३,२१३ गणरायांना निरोप देण्यात आला.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव