शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कृत्रिम तलावांचा नवी मुंबई पॅटर्न; पहिल्याच दिवशी ३,२२५ गणरायांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 00:39 IST

१३५ तलावांची निर्मिती; पर्यावरणाचेही संवर्धन

नवी मुंबई : पर्यावरण रक्षण व सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, यासाठी महानगरपालिकेने २३ मुख्य विसर्जन स्थळाव्यतिरिक्त तब्बल १३५ कृत्रिम तलाव तयार केले आहेत. पहिल्याच दिवशी या ठिकाणी ३,२२५ गणरायांना निरोप देण्यात आला. यापुढेही याविषयी व्यापक जनजागृती करून पर्यावरण संवर्धन व कोरोना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून शहरातील २३ तलावांमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येते. यापूर्वी कोपरीमध्ये कृत्रिम तलाव निर्माण केला जात होता, परंतु त्याला भाविकांकडूनही प्रतिसाद मिळत नव्हता. कोपरीमधील तलाव गणेशभक्तांसाठीही गैरसोयीचा होता. या वर्षी आयुक्त अभिजीत बांगर यांनी नागरिकांच्या सोयीप्रमाणे उद्यान, मैदान, बसडेपो व इतर मोकळ्या जागेवर कृत्रिम तलाव निर्माण करण्याचे आदेश दिले होते. मनपाच्या अभियांत्रिकी विभागाने तब्बल १३५ ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली.

प्रत्येक तलावावर स्वयंसेवक, सफाई कामगार, मनपाचे अभियंते तैनात करण्यात आले होते. माजी नगरसेवक, सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी व्यापक जनजागृती केली होती. या सर्वांचा सकारात्मक परिणाम होऊन रविवारी पहिल्या दिवशी नागरिकांकडून कृत्रिम तलावांना चांगला प्रतिसाद मिळाला. ३,१०० घरगुती व १२५ सार्वजनिक गणरायांना कृत्रिम तलावांमध्ये निरोप देण्यात आला आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला आहे. कृत्रिम तलावांनाही पसंती दिली जात आहे. कृत्रिम तलाव नक्की कुठे आहेत, याविषयी लोकप्रतिनिधींनीही जनजागृती केली होती. अनंत चतुर्थीपर्यंत लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांमध्ये अशाच प्रकारे जनजागृती केली, तर अजून प्रतिसाद वाढू शकणार आहे. पहिल्या दिवशी कृत्रिम तलावांमध्ये ३,२२५ व पारंपरिक तलावांमध्ये ३,२१३ गणरायांना निरोप देण्यात आला.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव