शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

नवी मुंबई, पनवेल, उरणची रुग्णसंख्या एक लाखाकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:06 IST

८५,८८७ कोरोनामुक्त : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले , दोन टक्के रुग्णांचा मृत्यू

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी पूर्णपणे थांबलेला नाही. नवीन प्रकारचा कोरोना पसरण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. शहरवासीयांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले असले तरी नागरिकांकडून मात्र नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू झाले आहे. नवी मुंबई, पनवेल व उरणमधील रुग्णसंख्या तब्बल ८९ हजार ३४० झाली आहे. प्रतिदिन सरासरी दोन जणांचा मृत्यू होत असून नागरिकांनी योग्य काळजी घेतली नाही तर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दोन महानगरपालिका, एक नगरपालिका, जेएनपीटी बंदर व दाेन औद्योगिक वसाहतींचा समावेश होतो. काेरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव होणाऱ्या शहरांमध्येही नवी मुंबईचा समावेश आहे. पनवेल व उरण परिसरामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण पनवेलमध्ये आहेत. आरोग्य विभागाने प्रयत्न करून प्रादुर्भाव कमी झाला आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. परंतु अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. यामुळे नागरिकांनी वारंवार हात धुणे, मास्कचा वापर व गर्दी टाळणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु नागरिकांकडून आता नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. सरकारी कार्यालयांमध्येही कामानिमित्त जाणारे नागरिकही अनेकदा मास्क वापरत नाहीत. मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. हॉटेलमध्ये ५० टक्के क्षमतेच्या नियमांचे उल्लंघन होते आहे. असाच प्रकार सुरू राहिल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. परंतु मागील काही महिन्यांमध्ये मृत्युदर दोन टक्क्यांच्या खाली येत नाही. आयसीयू व व्हेंटिलेटर्सची गरजही अनेक रुग्णांना लागत आहे. नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनाची जागृती तीनही शहरे कोरोनामुक्त करायची असतील तर नागरिकांनी नियमांचे कोटेकोर पालन करणे आवश्यक असून प्रशासनानेही त्यादृष्टीने जनजागृती सुरू केली आहे.