शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

स्वच्छता अभियानासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज; पाच लाख कुटुंबीयांपर्यंत जनजागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 01:04 IST

लोकसहभाग ठरणार महत्त्वाचा : पाच लाख कुटुंबीयांपर्यंत जनजागृतीची गरज

नवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली आहे. भिंतींवर चित्रे काढण्यापासून ते कचरा संकलनापर्यंत सर्व पातळीवर परिश्रम घेतले जात आहेत. अभियानाचे यश लोकसहभागावर अवलंबून असणार आहे. यामुळे स्वच्छतेचे महत्त्व ५ लाख ३८ हजार कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून या चळवळीमध्ये राजकीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, कार्यकर्ते व प्रत्येक नागरिकांचे सहकार्य हवे आहे. लोकसहभाग वाढल्यास देशातील सर्वात स्वच्छ शहर होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

सायन-पनवेल महार्गावरील उड्डाणपुलाच्या बकाल भिंतींवर चित्रे रेखाटण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अस्वच्छ असणाऱ्या या परिसराचा चेहरा बदलू लागला आहे. सानपाडा ते एपीएमसी दरम्यान फेरीवाल्यांचे अतिक्रमण असलेल्या पदपथावरील अतिक्रमण दूर झाले असून मॅफ्कोच्या संरक्षण भिंती चित्रांमुळे बोलक्या झाल्या आहेत. ज्या ठिकाणावरून जाताना दुर्गंधीमुळे श्वास घेतानाही त्रास होत होता तेथील भिंतीही रंगवल्यामुळे सेल्फी घेण्यासाठी रांगा लागू लागल्या आहेत. स्वच्छता अभियान २०२१ला महानगरपालिकेने गती देण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वत: स्वच्छतेच्या कामाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

स्वच्छतेची चळवळ सुरू झाली असून या चळवळीमध्ये जास्तीत जास्त लोकसहभाग वाढविण्यासाठी जनजागृती केली जात आहे. या वर्षीच्या स्पर्धेमध्ये लोकसहभागाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. नागरिकांनी ओला-सुका कचरा वर्गीकरण, स्वच्छता मोहिमा यामध्ये किती सहभाग घेतला. स्वच्छतेविषयी नागरिकांना काय वाटते याला विशेष महत्त्व असणार आहे. यामुळे नागरिकांनी अभियानामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.गृहनिर्माण सोसायटीने ओला व सुका कचरा वेगळा करावा. ५० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होत असल्यास त्यावर सोसायटीमध्येच खतनिर्मिती करावी. प्रभागात स्वच्छता मोहिमांचे आयोजन केल्यानंतर नागरिकांनी सहभागी व्हावे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई