शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

स्वच्छता अभियानासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज; पाच लाख कुटुंबीयांपर्यंत जनजागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 01:04 IST

लोकसहभाग ठरणार महत्त्वाचा : पाच लाख कुटुंबीयांपर्यंत जनजागृतीची गरज

नवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली आहे. भिंतींवर चित्रे काढण्यापासून ते कचरा संकलनापर्यंत सर्व पातळीवर परिश्रम घेतले जात आहेत. अभियानाचे यश लोकसहभागावर अवलंबून असणार आहे. यामुळे स्वच्छतेचे महत्त्व ५ लाख ३८ हजार कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून या चळवळीमध्ये राजकीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, कार्यकर्ते व प्रत्येक नागरिकांचे सहकार्य हवे आहे. लोकसहभाग वाढल्यास देशातील सर्वात स्वच्छ शहर होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

सायन-पनवेल महार्गावरील उड्डाणपुलाच्या बकाल भिंतींवर चित्रे रेखाटण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अस्वच्छ असणाऱ्या या परिसराचा चेहरा बदलू लागला आहे. सानपाडा ते एपीएमसी दरम्यान फेरीवाल्यांचे अतिक्रमण असलेल्या पदपथावरील अतिक्रमण दूर झाले असून मॅफ्कोच्या संरक्षण भिंती चित्रांमुळे बोलक्या झाल्या आहेत. ज्या ठिकाणावरून जाताना दुर्गंधीमुळे श्वास घेतानाही त्रास होत होता तेथील भिंतीही रंगवल्यामुळे सेल्फी घेण्यासाठी रांगा लागू लागल्या आहेत. स्वच्छता अभियान २०२१ला महानगरपालिकेने गती देण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वत: स्वच्छतेच्या कामाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

स्वच्छतेची चळवळ सुरू झाली असून या चळवळीमध्ये जास्तीत जास्त लोकसहभाग वाढविण्यासाठी जनजागृती केली जात आहे. या वर्षीच्या स्पर्धेमध्ये लोकसहभागाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. नागरिकांनी ओला-सुका कचरा वर्गीकरण, स्वच्छता मोहिमा यामध्ये किती सहभाग घेतला. स्वच्छतेविषयी नागरिकांना काय वाटते याला विशेष महत्त्व असणार आहे. यामुळे नागरिकांनी अभियानामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.गृहनिर्माण सोसायटीने ओला व सुका कचरा वेगळा करावा. ५० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होत असल्यास त्यावर सोसायटीमध्येच खतनिर्मिती करावी. प्रभागात स्वच्छता मोहिमांचे आयोजन केल्यानंतर नागरिकांनी सहभागी व्हावे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई