शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

नवी मुंबई : आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणीचे अपहरण, पतीला मारहाण करून पत्नीला पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:52 IST

पतीसोबत फिरण्यासाठी मुंबईतून नवी मुंबईत आलेल्या विवाहितेला पळवून नेल्याचा प्रकार वाशीत घडला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या दाम्पत्याचा आंतरजातीय प्रेमविवाह झालेला असल्याने तिच्या नातेवाइकांनीच तिचे अपहरण केल्याची शक्यता पतीने वर्तवली आहे.

नवी मुंबई : पतीसोबत फिरण्यासाठी मुंबईतून नवी मुंबईत आलेल्या विवाहितेला पळवून नेल्याचा प्रकार वाशीत घडला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या दाम्पत्याचा आंतरजातीय प्रेमविवाह झालेला असल्याने तिच्या नातेवाइकांनीच तिचे अपहरण केल्याची शक्यता पतीने वर्तवली आहे.मानखुर्द येथे राहणाºया मोहम्मद इक्बाल मोहम्मद उमर चौधरी (२८) यांंच्यासोबत हा प्रकार घडला आहे. रविवारी दुपारी ते पत्नी रेशमासोबत वाशीतील मॉलमध्ये आले होते. मॉलमध्ये खरेदी केल्यानंतर ते रेल्वेस्थानकासमोरील रस्त्यावरून जात होते. या वेळी कारमधून आलेल्या चौघांनी त्यांना मारहाण करून पत्नी रेशमा हिला पळवून नेले. याप्रकरणी पतीने तिच्या अपहरणाची तक्रार वाशी पोलिसांकडे केली आहे. शिवाय कारमधून आलेल्या तरुणांनी मारहाण करताना केलेल्या वक्तव्यावरून ते तिचे माहेरचे नातेवाईक असावेत अशी शक्यताही वर्तवली आहे. यानुसार पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे कारचा शोध घेऊन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. रेशमा ही मूळची बंगळुरूची असून मोहम्मद चौधरीसोबत तिची चार वर्षांपूर्वी फेसबुकवरून ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांच्यात प्रेम झाले असता तिच्या घरच्यांनी लग्नाला विरोध दर्शवला होता. अखेर जुलै महिन्यात ती पळून मुंबईला आली असता, दोघांनी लग्न केले. त्यानुसार मागील सहा महिन्यांपासून ती पती मोहम्मद याच्यासोबत मानखुर्द येथे राहायला होती. या लग्नावरून रेशमाच्या कुटुंबासोबत मोहम्मद यांचा वाद देखील झाला होता, असेही समजते. याच कारणातून रेशमाच्या घरच्यांनीच तिला पळवल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. त्यानुसार वाशी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Kidnappingअपहरण