शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटीचे नवी मुंबई हे पहिले विमानतळ; ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती  

By कमलाकर कांबळे | Updated: January 13, 2024 18:44 IST

गतीशक्ती योजनेंतर्गत देशातील प्रत्येक विमानतळाला मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे.

नवी मुंबई: गतीशक्ती योजनेंतर्गत देशातील प्रत्येक विमानतळाला मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. त्यानुसार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ असेल, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. नागरी उड्डाण मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाकडून प्रत्येक महिन्याला या कामाचा अहवाल मागविला जातो. शिंदे यांनी शनिवारी प्रत्यक्ष प्रकल्प स्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर सिडकोसह संबधित यंत्रणासोबत बैठक घेऊन आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मेट्रोचे तीन मार्ग विमानतळाला जोडणारनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्ते, रेल्वे आणि मेट्रोची कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. तर, भविष्यात जलमार्गाचा पर्यायसुद्धा उपलब्ध केला जाणार आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग ४ बी ३४८, सायन पनवेल-महामार्ग आणि शुक्रवारी उद्घाटन झालेला शिवडी-न्हावाशेवा सेतू हे तीन मार्ग विमानतळाला जोडले गेले आहेत. तर, खारकोपर-उरण मार्गावरील तरघर रेल्वेस्थानक विमानतळाच्या जवळ आहे. तसेच, मेट्रोचे तीन मार्ग विमानतळाला जोडले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर आणि अदानी समूहाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.विमानतळाचे पहिले टेकऑफ लांबणीवर

नवी मुंबई विमानतळ हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पहिला टप्पा डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु, त्याचा व्यावसायिक वापर ३१ मार्च २०२५ पासून सुरू केला जाईल. कारण विमानतळ प्रकल्पासाठी वेगवेगळ्या संस्था काम करीत आहेत. त्यानुसार प्रत्येक संस्थेला जबाबदारी आणि डेडलाइन आखून दिल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

नामकरणाचा निर्णय कॅबिनेट घेईलनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. असे असले तरी या नामकरणाचा निर्णय कॅबिनेट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

विमानतळाची वैशिष्ट्ये

नवी मुंबई विमानतळ पाच टप्प्यांत उभारले जाणार आहे. टप्पा क्रमांक १ आणि २ एकत्रित पूर्ण केले जाणार आहे. यात एक टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत हा टप्पा व्यावसायिक वापरासाठी खुला होईल. याअंतर्गत दोन कोटी प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज आहे. तर, टप्पा क्रमांक ३, ४ आणि ५ मध्ये तीन टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. या टप्प्यानंतर वार्षिक ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल, असा अंदाज शिंदे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे