शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

२०१९ साली नवी मुंबईतून होणार विमान उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 04:16 IST

स्वातंत्र्यानंतर देशात सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. मागच्या सरकारच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प २० वर्षे रखडला

नवी मुंबई : स्वातंत्र्यानंतर देशात सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. मागच्या सरकारच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प २० वर्षे रखडला; परंतु आम्ही सत्तेवर येताच हा प्रश्न मार्गी लावला, असे सांगत २०१९ साली या विमानतळावरून पहिले विमान उड्डाण होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पायाभरणी आणि जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवारी उलवे येथे झाले. या प्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूनक व नौकानयनमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पी. अशोक गजपती राजू उपस्थित होते. येत्या काळात देशातील बंदर विकास आणि जहाज बांधणीला प्राधान्य दिले जाणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.देशात आतापर्यंत एव्हिएशन पॉलिसी नव्हती. ती पॉलिसी आमच्या सरकारने तयार केली आहे. याअंतर्गत देशभरात आता लहान-मोठ्या १०० विमानतळांचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी ९०० नवीन विमाने खरेदी केली जाणार आहेत.पायात हवाई चप्पल घालणाºया सर्वसामान्य नागरिकालाही हवाई सफारी करता यावी, हे सरकारचे धोरण असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी या वेळी व्यक्त केले. वीस वर्षे रखडलेला विमानतळ प्रकल्प केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे मार्गी लागला. असे असले तरी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे योगदान मोठे असल्याचे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी