शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Navi Mumbai: दबावाला बळी न पडता निर्धाराने लढत रहा, विश्वजीत पाटील यांचे आवाहन

By नामदेव मोरे | Updated: February 9, 2024 14:01 IST

Navi Mumbai: जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही दबावाला बळी पडू नका, निर्धाराने लढत रहा. नवी मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनत चालले आहे. येथील अनागोंधी कारभाराविरोधात असाच आवाज उठवा असे आवाहन काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई - जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही दबावाला बळी पडू नका, निर्धाराने लढत रहा. नवी मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनत चालले आहे. येथील अनागोंधी कारभाराविरोधात असाच आवाज उठवा असे आवाहन काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे.

नवी मुंबईकरांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर क्रांती हक्क मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला संबोधीत करताना विश्वजीत कदम यांनी महानगरपालिकेच्या कामकाजावर हल्लाबोल केला. एकेकाळी विकासासाठी आघाडीवर असणारी महानगरपालिका भ्रष्टाचाराचे करण होत चालली आहे. काही नेतेमंडळीमुळे महानगरपालिकेची ही अवस्था झाली आहे. आरोग्य, पाणी पुरवठ्यासह नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. चुकीच्या कामकाजाविरोधात युवक काँग्रेसचे अनिकेत म्हात्रे यांनी आवाज उठविला आहे. शहरवासीयांनी त्यांना साथ द्यावी. कोणत्याही दबावाला बळी न पडता पुर्ण ताकदीने लढण्याचे आवाहनही त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. देशात, राज्यात व नवी मुंबईमध्येही परिवर्तन करायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज जे आयुक्त तुम्हाला वेळ देत नाहीत ते घरी येवून तुम्ही सांगीतलेली जनहिताची कामे करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

अनिकेत म्हात्रे यांनी महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये योग्य उपचार मिळत नाहीत. आयुक्त पाठपुरावा करूनही वेळ देत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. क्रांती हक्क मोर्चाला शहरवासीयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रमाकांत म्हात्रे यांनीही शहरात युवक काँग्रेसच्या माध्यमातून ३६ चौक सभा झाल्या. सर्व सभांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. महानगरपालिकेत तीच तीच कामे पुन्हा पुन्हा केली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. जनहिताची कामे करत नसतील तर मालमत्ता कर भरू नका असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिल कौशीक यांनी काँग्रेसने आतापर्यंत शहराच्या विकासासाठी काय कामे केली याविषयी माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक संतोष शेट्टी, अंकुश सोनावणे, रविंद्र सावंत, मंदाकिनी म्हात्रे, महिला जिल्हा अध्यक्षा पूनम पाटील, अनंत सिंग, उज्वला साळवी, नासीर हुसेन, अन्वर हवालदार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर मोर्चा आढविण्यात आल्यामुळे विश्वजीत कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निषेध केला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई