शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
6
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
7
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
8
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
9
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
10
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
11
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
12
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
13
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
14
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
15
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
16
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
17
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
18
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
19
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
20
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी

नेवाळीत कोम्बिंग आॅपरेशन

By admin | Updated: June 24, 2017 00:35 IST

नेवाळीच्या धावपट्टीसाठी दिलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी घेतलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण कोणी दिले

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळीच्या धावपट्टीसाठी दिलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी घेतलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण कोणी दिले, उद्रेकासाठी त्यांना कोणी फूस लावली, याचा शोध घेण्यासाठी गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन केले. या वेळी पोलिसांनी नेवाळी, नेवाळी पाडा, चिंचवली या गावातील घरांच्या दारावर लाथा मारल्या, खिडक्यांच्या काचा फोडल्या. घराबाहेर असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. त्यामुळे घरातील महिला व लहान मुलांनी रात्र जागून काढली, असा आरोप गावकऱ्यांनी केला. तो पोलिसांनी फेटाळून लावला. पण या घटनेचे आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे, असा दावा गावकऱ्यांनी केल्याने पोलीस-गावकऱ्यांतील संघर्ष चिघळला आहे. आंदोलनानंतर आता गावात पोलिसांच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नेवाळी परिसरात आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता होती. रास्ता रोको आणि मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या मते आमचे आंदोलन शांततेत सुरु होते. पोलिसांनी भाल गावातील महिला मोर्चेकऱ्यांवर लाठीमार केल्याने पुरुष आंदोलकांनी प्रतिकार करण्यासाठी पोलिसांवर दगडफेक केली, असा त्यांचा युक्तिवाद आहे; तर पोलिसांनी मात्र आंदोलक हिंसक झाल्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी दगडफेक करुन दंडुक्यांनी मारहाण करत जाळपोळ करत आंदोलनाला हिंसक वळण दिले. त्यामुळे गुरूवारी रात्री डोंबिवलीत १५० ते २०० जणांविरोधात आणि शुक्रवारी उल्हासनगरच्या हिललाइन पोलीस ठाण्यात २५० ते ३०० आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. या आंदोलकांपैकी शंभराहून अधिक जण हल्लेखोर असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. हे हल्लेखोर गावातील आहेत की आसपासच्या परिसरातील आहेत, त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी वेगवेगळ््या मार्गांनी सुरू केले आहे.पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हे दाखल करून हिंसक आंदोलकांचा शोध घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्या आंदोलकांच्या शोधासाठी पोलिसांनी मध्यरात्री कोम्ंिबग आॅपरेशन सुरु केले. नेवाळी, नेवाळी पाडा आणि चिंचवली परिसरात पोलीस रात्रीच्या सुमारास घुसले. पण दारे उघडली जात नसल्याने त्यांनी दारावर लाथा मारल्या, असा आरोप गावकऱ्यांनी केला: तर काही महिलांनी पोलिसांनी रात्री पुन्हा पेलेट गनमधून गोळ््या झाडल्याचा आरोप केला. पोलिसांनी गाड्या उलथवून टाकल्या, खिडक्यांच्या काचा फोडल्या. रस्त्यावर घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी वातावरण शांत करण्याऐवजी लगेचच कोम्ंिबग आॅपरेशन करुन करुन तणाव वाढवला. त्यामुले गुरूवारच्या आंदोलनानंतर नेवाळी परिसरातील शाळा-कॉलेज दुसऱ्या दिवशीही बंद होती. मुलांच्या मनातही भीती होती. पोलिसांकडून बळाचा वापर सुरुच आहे. तसा वापर त्यांनी सुरुच ठेवला, तरी आंदोलन सुरु राहील, असा इशारा स्थानिक ग्रामस्थ सुनील राणे यांनी दिला. ग्रामस्थांनी पोलिसांवर केलेले आरोप पोलिसांनी मात्र फेटाळून लावले. आंदोलकांच्या शोधासाठी पोलीस गावात गेले होते. त्यांनी कोणाच्याही मालमत्तेचे नुकसान केलेले नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण पोलिसांनी गावात नुकसान केल्याचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.