शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

नेवाळीत कोम्बिंग आॅपरेशन

By admin | Updated: June 24, 2017 00:35 IST

नेवाळीच्या धावपट्टीसाठी दिलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी घेतलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण कोणी दिले

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळीच्या धावपट्टीसाठी दिलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी घेतलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण कोणी दिले, उद्रेकासाठी त्यांना कोणी फूस लावली, याचा शोध घेण्यासाठी गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन केले. या वेळी पोलिसांनी नेवाळी, नेवाळी पाडा, चिंचवली या गावातील घरांच्या दारावर लाथा मारल्या, खिडक्यांच्या काचा फोडल्या. घराबाहेर असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. त्यामुळे घरातील महिला व लहान मुलांनी रात्र जागून काढली, असा आरोप गावकऱ्यांनी केला. तो पोलिसांनी फेटाळून लावला. पण या घटनेचे आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे, असा दावा गावकऱ्यांनी केल्याने पोलीस-गावकऱ्यांतील संघर्ष चिघळला आहे. आंदोलनानंतर आता गावात पोलिसांच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नेवाळी परिसरात आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता होती. रास्ता रोको आणि मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या मते आमचे आंदोलन शांततेत सुरु होते. पोलिसांनी भाल गावातील महिला मोर्चेकऱ्यांवर लाठीमार केल्याने पुरुष आंदोलकांनी प्रतिकार करण्यासाठी पोलिसांवर दगडफेक केली, असा त्यांचा युक्तिवाद आहे; तर पोलिसांनी मात्र आंदोलक हिंसक झाल्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी दगडफेक करुन दंडुक्यांनी मारहाण करत जाळपोळ करत आंदोलनाला हिंसक वळण दिले. त्यामुळे गुरूवारी रात्री डोंबिवलीत १५० ते २०० जणांविरोधात आणि शुक्रवारी उल्हासनगरच्या हिललाइन पोलीस ठाण्यात २५० ते ३०० आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. या आंदोलकांपैकी शंभराहून अधिक जण हल्लेखोर असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. हे हल्लेखोर गावातील आहेत की आसपासच्या परिसरातील आहेत, त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी वेगवेगळ््या मार्गांनी सुरू केले आहे.पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हे दाखल करून हिंसक आंदोलकांचा शोध घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्या आंदोलकांच्या शोधासाठी पोलिसांनी मध्यरात्री कोम्ंिबग आॅपरेशन सुरु केले. नेवाळी, नेवाळी पाडा आणि चिंचवली परिसरात पोलीस रात्रीच्या सुमारास घुसले. पण दारे उघडली जात नसल्याने त्यांनी दारावर लाथा मारल्या, असा आरोप गावकऱ्यांनी केला: तर काही महिलांनी पोलिसांनी रात्री पुन्हा पेलेट गनमधून गोळ््या झाडल्याचा आरोप केला. पोलिसांनी गाड्या उलथवून टाकल्या, खिडक्यांच्या काचा फोडल्या. रस्त्यावर घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी वातावरण शांत करण्याऐवजी लगेचच कोम्ंिबग आॅपरेशन करुन करुन तणाव वाढवला. त्यामुले गुरूवारच्या आंदोलनानंतर नेवाळी परिसरातील शाळा-कॉलेज दुसऱ्या दिवशीही बंद होती. मुलांच्या मनातही भीती होती. पोलिसांकडून बळाचा वापर सुरुच आहे. तसा वापर त्यांनी सुरुच ठेवला, तरी आंदोलन सुरु राहील, असा इशारा स्थानिक ग्रामस्थ सुनील राणे यांनी दिला. ग्रामस्थांनी पोलिसांवर केलेले आरोप पोलिसांनी मात्र फेटाळून लावले. आंदोलकांच्या शोधासाठी पोलीस गावात गेले होते. त्यांनी कोणाच्याही मालमत्तेचे नुकसान केलेले नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण पोलिसांनी गावात नुकसान केल्याचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.