शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळीत कोम्बिंग आॅपरेशन

By admin | Updated: June 24, 2017 00:35 IST

नेवाळीच्या धावपट्टीसाठी दिलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी घेतलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण कोणी दिले

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळीच्या धावपट्टीसाठी दिलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी घेतलेल्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण कोणी दिले, उद्रेकासाठी त्यांना कोणी फूस लावली, याचा शोध घेण्यासाठी गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन केले. या वेळी पोलिसांनी नेवाळी, नेवाळी पाडा, चिंचवली या गावातील घरांच्या दारावर लाथा मारल्या, खिडक्यांच्या काचा फोडल्या. घराबाहेर असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. त्यामुळे घरातील महिला व लहान मुलांनी रात्र जागून काढली, असा आरोप गावकऱ्यांनी केला. तो पोलिसांनी फेटाळून लावला. पण या घटनेचे आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे, असा दावा गावकऱ्यांनी केल्याने पोलीस-गावकऱ्यांतील संघर्ष चिघळला आहे. आंदोलनानंतर आता गावात पोलिसांच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नेवाळी परिसरात आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता होती. रास्ता रोको आणि मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या मते आमचे आंदोलन शांततेत सुरु होते. पोलिसांनी भाल गावातील महिला मोर्चेकऱ्यांवर लाठीमार केल्याने पुरुष आंदोलकांनी प्रतिकार करण्यासाठी पोलिसांवर दगडफेक केली, असा त्यांचा युक्तिवाद आहे; तर पोलिसांनी मात्र आंदोलक हिंसक झाल्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी दगडफेक करुन दंडुक्यांनी मारहाण करत जाळपोळ करत आंदोलनाला हिंसक वळण दिले. त्यामुळे गुरूवारी रात्री डोंबिवलीत १५० ते २०० जणांविरोधात आणि शुक्रवारी उल्हासनगरच्या हिललाइन पोलीस ठाण्यात २५० ते ३०० आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. या आंदोलकांपैकी शंभराहून अधिक जण हल्लेखोर असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. हे हल्लेखोर गावातील आहेत की आसपासच्या परिसरातील आहेत, त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी वेगवेगळ््या मार्गांनी सुरू केले आहे.पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हे दाखल करून हिंसक आंदोलकांचा शोध घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्या आंदोलकांच्या शोधासाठी पोलिसांनी मध्यरात्री कोम्ंिबग आॅपरेशन सुरु केले. नेवाळी, नेवाळी पाडा आणि चिंचवली परिसरात पोलीस रात्रीच्या सुमारास घुसले. पण दारे उघडली जात नसल्याने त्यांनी दारावर लाथा मारल्या, असा आरोप गावकऱ्यांनी केला: तर काही महिलांनी पोलिसांनी रात्री पुन्हा पेलेट गनमधून गोळ््या झाडल्याचा आरोप केला. पोलिसांनी गाड्या उलथवून टाकल्या, खिडक्यांच्या काचा फोडल्या. रस्त्यावर घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी वातावरण शांत करण्याऐवजी लगेचच कोम्ंिबग आॅपरेशन करुन करुन तणाव वाढवला. त्यामुले गुरूवारच्या आंदोलनानंतर नेवाळी परिसरातील शाळा-कॉलेज दुसऱ्या दिवशीही बंद होती. मुलांच्या मनातही भीती होती. पोलिसांकडून बळाचा वापर सुरुच आहे. तसा वापर त्यांनी सुरुच ठेवला, तरी आंदोलन सुरु राहील, असा इशारा स्थानिक ग्रामस्थ सुनील राणे यांनी दिला. ग्रामस्थांनी पोलिसांवर केलेले आरोप पोलिसांनी मात्र फेटाळून लावले. आंदोलकांच्या शोधासाठी पोलीस गावात गेले होते. त्यांनी कोणाच्याही मालमत्तेचे नुकसान केलेले नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण पोलिसांनी गावात नुकसान केल्याचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.